AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या हमीशिवाय भारतात अविवाहित मुली शरीरसंबंध ठेवत नाहीत : मध्य प्रदेश हायकोर्ट

कोर्टाच्या मते, भारतासारख्या रुढीप्रिय समाजात अविवाहित मुली लग्नाची निश्चिंती असल्याशिवाय केवळ मौजमजेसाठी मुलांसोबत शरीरसंबंध ठेवत नाहीत, असं न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर म्हणाले

लग्नाच्या हमीशिवाय भारतात अविवाहित मुली शरीरसंबंध ठेवत नाहीत : मध्य प्रदेश हायकोर्ट
कोर्ट
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 15, 2021 | 4:12 PM
Share

भोपाळ : लग्नाची निश्चिती नसेल, तर भारतात अविवाहित मुली शारीरिक संबंध ठेवत नाहीत, असं वक्तव्य करत मध्य प्रदेश हायकोर्टाच्या इंदौर खंडपीठाने लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. भारत हा रुढीप्रिय समाज आहे, तो इतक्या प्रगत पातळीवर पोहोचलेला नाही, जिथे अविवाहित मुली केवळ मौजमजेसाठी मुलांसोबत शरीरसंबंध ठेवणं मान्य करतील, असं न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर म्हणाले.

काय आहे प्रकरण?

कोर्टाच्या मते, भारतासारख्या रुढीप्रिय समाजात अविवाहित मुली लग्नाची निश्चिंती असल्याशिवाय केवळ मौजमजेसाठी मुलांसोबत शरीरसंबंध ठेवत नाहीत, असं न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर म्हणाले. लग्नास नकार दिल्यामुळे पीडितेने दोन जूनला विषप्राशन केले होते. पोलिसांनी तिचा ‘अखेरचा जबाब’ नोंदवला, मात्र सुदैवाने ती बचावली. लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

आरोपीच्या वकिलांचा दावा काय

आरोपीविरोधात कलम 376 (बलात्कार) आणि अन्य कलमांच्या अंतर्गत उज्जैन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. लग्नाच्या आमिषाने युवकाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र दोघांमध्ये अडीच वर्ष प्रेमसंबंध असून परस्पर संमतीने त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते, मात्र धर्माच्या कारणास्तव मुलीच्या आई-वडिलांनीच या लग्नाला विरोध केला होता, असे आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

कोर्टाचे तरुणावर ताशेरे

आरोपीने ऑक्टोबर 2018 पासून लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. त्यानंतर, त्याने लग्नासही नकार दिला. त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न होत असल्याचे समजल्यावर पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा दावा फिर्यादी तरुणीच्या वकिलांनी कोर्टात केला. त्यानंतर, न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. मुलाने कोणतेही कृत्य करताना जबाबदारीचे भान बाळगावे, कारण अशा प्रकरणात मुलींना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, याकडेही कोर्टाने लक्ष वेधले

संबंधित बातम्या :

पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही, मुंबई सेशन कोर्टाचा निकाल

Follow Us
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!