AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय घडलं ‘त्या’ खोलीत?, तो शांत झोपला, पुन्हा उठलाच नाही… ती रात्र काळरात्र ठरली

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीनेच पतीचा गळा दाबून आत्महत्येचा बनाव रचल्याचं उघडकीस आलं आहे. पण पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच पाच दिवसानंतर संपूर्ण प्रकारावर पडदा पडला.

काय घडलं 'त्या' खोलीत?, तो शांत झोपला, पुन्हा उठलाच नाही... ती रात्र काळरात्र ठरली
Extra Marital AffairImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 11, 2023 | 6:17 AM
Share

मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे हृदयाचा काप उडवणारी धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने प्रियकराच्या साथीने पतीचा काढा काढल्याची घटना घडली आहे. पतीचा खून करूनच ती थांबली नाही. तर तिने चक्क पतीच्या मृतदेहसोबत झोपून अख्खी रात्र काढली. कुणालाही संशय होऊ नये म्हणून तिने ही शक्कल लढवली. पण कायद्याच्या कचाट्यातून कोणीच सुटत नाही, तसंच तिचं झालं. अखेर ती पोलिसांच्या जाळ्यात आली आणि आता तुरुंगात कर्माची फळं भोगत आहे.

3 मे रोजी ही धक्कादायक घटना घडली. मथुराच्या नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीने प्रियकराच्या साथीने त्याची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पती आपल्या प्रेमाच्या वाटेत अडसर बनला होता. त्यामुळेच तिने पतीलाच मार्गातून कायमचा दूर करण्याचा डाव आखला. तिने प्रियकराच्या साथीने नवऱ्याची हत्या केली. नवऱ्याचा गळा दाबून त्याला ठार मारले. त्यानंतर रात्रभर नवऱ्याच्या मृतदेहासोबत झोपली. सकाळी उठून तिने ही हत्या आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. पण पाच दिवसानंतर हत्येचा खुलासा झाला आणि मारेकरी पत्नीचा खेळ खल्लास झाला.

गळ्यात दुपट्टा टाकला

सकाळी उठल्यावर पत्नीने पतीच्या गळ्यात दुपट्टा टाकला. त्याने आत्महत्या केली असं समजावं असा तिचा प्रयत्न होता. पोलिसांनाही संशय होऊ नये म्हणून तिने हा बनाव रचला. त्यानंतर पतीच्या मृत्यूचा धक्का बसल्याचं दाखवण्यासाठी छाती जोरजोरात पिटत ती रडू लागली. पण पहिल्याच दिवशी मृतक व्यक्तीची पत्नी नीतू सैनी (वय 25) च्या हालचाली, बोलणं, वागणं पोलिसांना संदिग्ध वाटलं. तिच्या बोलण्यातही एक वाक्यता नव्हती. त्यामुळेच पोलिसांनी आत्महत्येऐवजी हत्येचा गुन्हा दाखल केला.

पोस्टमार्टममधून पोलखोल

मृतदेह पोस्टमार्टमला पाठवलं. त्यानंतर जे कारण समोर आलं त्याने पोलीसही चक्रावून गेले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी नीतूला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच नीतू पोपटा सारखी बोलली. तिने सर्व प्रकार सांगत पोलिसांची गयावया करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. दोघांनाही कोर्टासमोर हजर केलं आणि दोघांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?