AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती आणि मुलांना सोडून प्रियकराकडे गेली, प्रियकरानेच आयुष्यातूनच उठवली !

मयत महिला आणि आरोपी गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. प्रियकरासोबत राहण्यासाठी महिला आपला पती आणि चार मुलांना सोडून आली होती.

पती आणि मुलांना सोडून प्रियकराकडे गेली, प्रियकरानेच आयुष्यातूनच उठवली !
कानपूरमध्ये अनैतिक संबंधातून महिलेची हत्याImage Credit source: social
| Updated on: Dec 05, 2022 | 9:15 PM
Share

कानपूर : वारंवार लग्नाचा तगादा लावत होती म्हणून प्रियकराने सुपारी देऊन प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. आरोपी महिलेला स्कूटीवर बसवून स्वतः मारेकऱ्यांकडे घेऊन गेला, तेथे गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. मयत महिला आणि आरोपी गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. प्रियकरासोबत राहण्यासाठी महिला आपला पती आणि चार मुलांना सोडून आली होती. अखेर या अनैतिक नात्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

या घटनेचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. घटनेचे वृत्त परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याचवेळी प्रियकराच्या कृत्यावर संताप देखील व्यक्त होत आहे.

महिला आधीपासूनच विवाहित

मयत महिला आधीच विवाहित असून, तिला चार मुलेही आहेत. पाच वर्षापूर्वी महिलेचे प्रेम केसरवानी याच्याशी प्रेमसंबंध जुळले. प्रेमसाठी सुशिला आपला पती आणि चार मुलांना सोडून आली होती. दोघे पाच वर्षे रिलेशनशीप राहत होते. आरोपी प्रेम केसरवानी हा देखील विवाहित असून त्याला एक मुलगा आहे.

वारंवार लग्नाचा तगादा लावल्याने काढला काटा

सुशिला वारंवार प्रेमकडे लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. यामुळे प्रेमने तिच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने मारेकऱ्यांना 70 हजार रुपयांची सुपारी दिली. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी प्रेम स्वतः सुशिलाला स्कूटीवरुन मारेकऱ्यांकडे विधनु परिसरात घेऊन गेला.

प्रियकराच्या समोरच प्रेयसीची हत्या

तेथे सुपारी किलर राजेश आधीच उपस्थित होता. राजेशने आपल्या साथीदारासह मिळून आधी सुशिलाला जमिनीवर ढकलले. मग गोळ्या घातल्या. विशेष म्हणजे सुशिलाची हत्या करताना प्रेम तेथे हजर होता. पोलिसांनी सुशिलाच्या हत्येप्रकरणी प्रेम केसरवानी आणि सुपारी किलरला अटक केली आहे.

शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....