AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम प्रकरणातून टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या, या हिंदी मालिकेने दिली होती ओळख

ये रिश्ता क्या कहलाता है, आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क आणि विष और अमृत या सारख्या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्रीने आत्महत्या केली.

प्रेम प्रकरणातून टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या, या हिंदी मालिकेने दिली होती ओळख
वैशाली ठक्कर Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 16, 2022 | 9:00 PM
Share

इंदूर,  टीव्ही मालिका अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar Suicide) हिने इंदूर येथे गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण प्रेमप्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. वैशालीने टीव्ही मालिका “ये रिश्ता क्या कहलाता है” (yeh rishta kya kehlata hai) आणि बिग बॉस सारख्या अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. वैशाली एक वर्षापासून इंदूरमध्ये (Indore) राहत होती अशी माहिती आहे. आत्महत्येची माहिती मिळताच तेजाजी नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास तेजाजी नगर पोलीस करत आहेत.

वैशालीला मिळाला आहे गोल्डन पेटल पुरस्कार

वैशाली ठक्कर ही मूळची इंदूरची असून, ती एका व्यापारी कुटुंबातील आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात अँकरिंगपासून केली. 2015 मध्ये, तिला स्टार प्लस शो ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये संजनाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या टेलिव्हिजन शोमधून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या शोनंतर ती ये वाद रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क आणि विष और अमृतमध्ये दिसली.

ससुराल सिमर का मधील अंजली भारद्वाज ही वैशालीची सर्वात लोकप्रिय भूमिका होती. ज्यासाठी तिला गोल्डन पेटल अवॉर्ड्समधील नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. 2019 मध्ये, वैशाली टीव्ही शो मनमोहिनीमध्ये दिसली. ज्यामध्ये तीने मानसीची भूमिका साकारली आहे. वैशालीने टेलिव्हिजनशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे.

वैशालीचे कुटुंब महिदपूरचे रहिवासी

. “ये रिश्ता क्या कहलाता है” या टेलिव्हिजन मालिकेतून वैशालीला टेलिव्हिजनवर पहिला ब्रेक मिळाला. वैशालीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. 2017 मध्ये, तिला सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी कलर्स गोल्डन पेटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैशाली ही मूळची उज्जैनमधील महिदपूरची आहे.

चित्रपट कलाकाराने अशा प्रकारे आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने आयुष्याची लढाई हरले आहेत. आता पोलीस तपासात काय वास्तव समोर येते हे पाहावे लागेल.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?