AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी CBSE कडून दहावीची परीक्षा रद्द, आता UP बोर्डाची परीक्षा स्थगित, महाराष्ट्रात काय होणार?

सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Board) बोर्डानेही मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश बोर्डाने दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे.

आधी CBSE कडून दहावीची परीक्षा रद्द, आता UP बोर्डाची परीक्षा स्थगित, महाराष्ट्रात काय होणार?
Student
| Updated on: Apr 15, 2021 | 5:02 PM
Share

लखनऊ : सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Board) बोर्डानेही मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश बोर्डाने दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Cm Yogi aadityanath)यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. योगी आदित्यनात यांनी 11 जणांच्या टीमसोबत चर्चा केल्यानंतर उत्तर प्रदेशातील सर्व शाळा 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुढील आदेशापर्यंत बोर्डाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. (After CBSE board exams, Uttar Pradesh board exams 2021 postponed due to COVID 19 pandemic, what will maharashtra state board do ssc hsc exams update)

यूपी बोर्डाच्या परीक्षांबाबत सध्या तरी नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मे महिन्यात त्याबाबत विचार केला जाईल. यूपीमध्ये बोर्ड परीक्षा एप्रिलला नियोजित होत्या. त्यांची तारीख पुढे ढकलून 8 मेपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र आता ही तारीखही पुढे ढकलली आहे.

नुकतंच यूपीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री दिनेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात दहावी-बारावीचे जवळपास 56 लाख विद्यार्थी परीक्षा देतात.

CBSE परीक्षांबाबत मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 14 एप्रिलला बैठक घेतली होती. त्यानंतर CBSE बोर्डाने  दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात 1 जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जूनपर्यंत होणार का? हे पाहावं लागेल.

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तर जून महिन्यात दहावीची परीक्षा आयोजित केली जाईल.

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं घेतला आहे. महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होणार याकडं राज्यातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाचा अभ्यास करु ,  राज्यातील बोर्डाच्या परीक्षांबाबत आम्ही तज्ञांचं मत घेऊ, असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या   

SSC, HSC Board Exam 2021 Postponed : दहावी बारावीच्या नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा कधी सुरु होणार? वर्षा गायकवाड यांनी काय सांगितलं?

CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, महाराष्ट्र बोर्डाचं काय?, वर्षा गायकवाड म्हणाल्या…

CBSE 10th Exam 2021 Cancelled: सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय, दहावीची परीक्षा रद्द, 12 वीची परीक्षा पुढे ढकलली

(After CBSE board exams, Uttar Pradesh board exams 2021 postponed due to COVID 19 pandemic, what will maharashtra state board do ssc hsc exams update)

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.