AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11वी प्रवेशाबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कधी होणार?

राज्य सरकारने अखेर अकरावी प्रवेशाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार 11 वी प्रवेशात एकवाक्यता येण्यासाठी सरकार वैकल्पिक (optional) सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेणार आहे.

11वी प्रवेशाबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कधी होणार?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 24, 2021 | 9:44 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यात. 10 वी निकाल आता शाळांच्या अंतर्गत मुल्यमापनानुसार घोषित करण्यात येणार आहेत. याचा परिणाम 11 वीच्या प्रवेशावरही झालाय. त्यामुळे राज्य सरकारने अखेर अकरावी प्रवेशाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार 11 वी प्रवेशात एकवाक्यता येण्यासाठी सरकार वैकल्पिक (optional) सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेणार आहे (Important announcement about 11th admission in Maharashtra by Varsha Gaikwad).

11 वी प्रवेशासाठी सीईटी कधी?

विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी सीईटीची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे ही परीक्षा कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय. यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलंय. त्या म्हणाल्या, “सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल.”

11 वी प्रवेशाबाबत नेमका निर्णय काय?

  • सीईटीसाठी एक समिती स्थापन
  • सीईटी राज्यातील सर्व महामंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी असेल
  • 11 वी प्रवेशासाठीची सीईटी विद्यार्थ्यांना ऐच्छिक, कोणतंही बंधन नाही
  • परीक्षा 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार
  • प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असणार
  • 100 गुणांची बहुपर्यायीपरीक्षा, 2 तास वेळ, ऑफलाईन परीक्षा
  • 10 वीच्या निकाल 15 जुलै दरम्यान लागणार असल्यानं ही सीईटी त्यानंतर 2 आठवड्यांमध्ये म्हणजे जुलै अखेर होण्याची शक्यता

हेही वाचा :

एआयसीटीईचा मोठा निर्णय, अभियांत्रिकी अभ्यासासाठी गणित, भौतिक आणि रासायनशास्त्र आवश्यक नाही

‘इग्नू’तील ऑनलाईन प्रवेशाची तारीख वाढवली; 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार

व्हिडीओ पाहा :

Important announcement about 11th admission in Maharashtra by Varsha Gaikwad

Follow Us
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?