AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरमध्ये बारावीचा पेपर फुटला, दहा वाजताच गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह व्हायरल

बारावी गणित (Mathematics) विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सकाळी 10 वाजताच गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह (Answer sheet) सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याची चर्चा रंगत आहे. शिक्षणाधिकारी श्रीगोंद्यात दाखल झाले आहेत. कुठल्या परीक्षा केंद्रावरून पेपर फुटला याचा तपास सध्या सुरू आहे.

अहमदनगरमध्ये बारावीचा पेपर फुटला, दहा वाजताच गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह व्हायरल
बारावी गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसाहित सोशल मीडियावर व्हायरलImage Credit source: TV9
| Updated on: Mar 14, 2022 | 1:19 PM
Share

अहमदनगर : बारावी गणित (Mathematics) विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सकाळी 10 वाजताच गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह (Answer sheet) सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याची चर्चा रंगत आहे. शिक्षणाधिकारी श्रीगोंद्यात दाखल झाले आहेत. कुठल्या परीक्षा केंद्रावरून पेपर फुटला याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र, सकाळी 10 वाजताच उत्तरपत्रिकेसह पेपर सोशल मीडियावर (Social media) बघितल्यानंतर आर्श्चय व्यक्त केले जात आहे. मात्र, या पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना काय फटका बसतो हे पाहण्यासारखे आहे.

अहमदनगरमध्ये बारावी गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा 

काही वेळे अगोदरच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेमध्ये माहिती देत असताना सांगितले होते की, राज्यामध्ये कुठेही पेपर फुटला नाहीये. मात्र, सोशल मीडियावर तर गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह व्हायरल झालेला दिसतो आहे. मुंबईमधील साठे कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता आणि त्या पाठोपाठ आता अहमदनगरमध्ये देखील गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा आहे.

इथे पाहा बारावी गणिताचा व्हायरल झालेला पेपर! 

Exam

मुंबईमध्ये केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची चर्चा

मुंबईच्या पेपर फुटीसंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते की,  पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे. याप्रकरणात शिक्षणमंत्री यांनी विधानपरिषदेमध्ये निवेदन देखील दिले आहे. आता बारावीच्या या गणिताच्या पेपर संदर्भात शिक्षणमंत्री काय बोलतात. याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये तर पेपर फुटीसंबंधात एका खासगी शिकवणीच्या चालकाला अटक देखील करण्यात आल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या : 

धक्कादायक…! खासगी शिकवणीच्या शिक्षकाने फोडला बारावी केमिस्ट्रीचा पेपर!

SSC Exam : दहावीच्या परीक्षांना 15 मार्चपासून सुरुवात, बोर्डाची जय्यत तयारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.