AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai University: “PhDला आलोय खरं पण पुढं काय?” मुंबई विद्यापीठाचा वेळकाढूपणा, हलगर्जीपणा आणि मार्गदर्शनाची सुद्धा बोंब!

Mumbai University: पेटनंतर पुढील प्रक्रियेसाठी विद्यापीठामध्ये मार्गदर्शन केंद्रच नाही. विद्यापीठ वगळता काही महाविद्यालयांमध्येही पीएचडी सेंटर आहेत.

Mumbai University: PhDला आलोय खरं पण पुढं काय? मुंबई विद्यापीठाचा वेळकाढूपणा, हलगर्जीपणा आणि मार्गदर्शनाची सुद्धा बोंब!
Educational LoanImage Credit source: indianexpress.com
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 14, 2022 | 8:54 AM
Share

मुंबई: संशोधन आणि अभ्यास करून डॉक्टरेट (Doctorate) पदवी मिळविण्याची विद्यार्थ्यांची इच्छा मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) हलगर्जीपणामुळे अपुरी राहतीये. कोणत्या विभागामध्ये किती जागा उपलब्ध आहेत. मार्गदर्शकांची संख्या किती आहे. त्यांच्याकडील विषय कोणते याबाबत माहिती मिळविताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय असा आरोप युवासेना सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात यांनी केला आहे. पेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. कारण पेटनंतर पुढील प्रक्रियेसाठी विद्यापीठामध्ये मार्गदर्शन (Guidance) केंद्रच नाही. विद्यापीठ वगळता काही महाविद्यालयांमध्येही पीएचडी सेंटर आहेत. अशा महाविद्यालयांची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करावी, त्याचबरोबर विद्यापीठाच्या वेबसाइटवर माहिती द्या, अशी मागणी थोरात यांनी केली.

विद्यापीठाचा वेळकाढूपणा, संशोधन विभागाची नकारात्मक कार्यशैली

संशोधन व पीएचडी करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे. परंतु मार्गदर्शकांची संख्या कमी आहे. अनेक गुणवत्ता असलेले प्राध्यापक आपल्याकडे असून त्यांची इच्छा या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची आहे. पण विद्यापीठाचा वेळकाढूपणा, अंतर्गत राजकारण, प्रबंध विभाग, संशोधन विभागाच्या नकारात्मक कार्यशैलीमुळे विद्यापीठ चांगल्या मार्गदर्शकांना मुकत असल्याचा आरोप थोरात यांनी केला. तसेच जास्तीत जास्त महाविद्यालयांमध्ये पीएचडी सेंटर सुरू करण्यावर भर देण्याची मागणीही त्यांनी केली.

स्वतंत्र संचालक असूनही निर्णयक्षमता नाही

विद्यापीठाचा रिसर्च ॲडमिनिस्ट्रेशन ॲण्ड प्रमोशन सेल या विभागासाठी स्वतंत्र संचालक असूनही निर्णयक्षमता त्यांच्याकडे नाही. हा विभाग केवळ कागदावरच आहे. प्रत्येक निर्णयासाठी कुलगुरू किंवा प्र-कुलगुरूंवर अवलंबून राहावे लागते. ही बाब अधिसभेच्या माध्यमातून निदर्शनास आणूनही अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही, असंही थोरात यांनी स्पष्ट केले.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.