AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCERT : NCERT पुस्तकातील कथेवरून वाद ! NCPCR कडून तक्रार दाखल

ही कथा प्रसिद्ध करण्यात आली आणि यावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) आक्षेप घेतला असून यासंदर्भात एनसीईआरटीकडून उत्तर मागवण्यात आलं आहे.

NCERT : NCERT पुस्तकातील कथेवरून वाद ! NCPCR कडून तक्रार दाखल
NCERT पुस्तकातील कथेवरून वाद
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 1:46 PM
Share

नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकात हर्ष मंदर यांनी लिहिलेल्या कथेवरून वाद निर्माण झालाय. ही कथा प्रसिद्ध करण्यात आली आणि यावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) आक्षेप घेतला असून यासंदर्भात एनसीईआरटीकडून उत्तर मागवण्यात आलं आहे. एनसीईआरटीच्या नववीच्या  पुस्तकात हर्ष मंदर (Harsh Mander) यांनी एक धडा लिहीला आहे ज्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. एका आठवड्यात या प्रकरणावर उत्तर द्यावं लागणार असल्याचं एनसीईआरटीकडून सांगण्यात आलंय.

NCPCR च्या वतीने अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी हा आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात बोलताना प्रियांक कानुनगो म्हणाले कि, आयोगाला ‘Moments’ या इंगजी पुस्तकात प्रकाशित झालेल्या ‘ Weathering the storm in Ersama’ या कथेविरोधात तक्रार आली होती ज्याचे लेखक हर्ष मंदर आहेत.

का आहे आक्षेप ?

देशात बालगृह चालवताना मनी लॉंडरिंगचा आरोप असणाऱ्या व्यक्तीने लिहिलेली कथा कशी छापली जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. हर्ष मंदर यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) चौकशी सुरु आहे.

‘त्या’ दोन बालगृहांशी हर्ष मंदर यांचा संबंध

NCPCRने गेल्याच वर्षी जुलैमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाकडे दोन बालगृहांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या बालगृहांवर अनियमिततेचा आरोप करण्यात आला होता या दोन्ही बालगृहांशी हर्ष मंदर यांचं नाव जोडलेलं होतं. याशिवाय आयोगाने A Home On The Street आणि Paying For His Tea या दोन कथेंवर देखील आक्षेप घेतला आहे. बालसंगोपण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने या कथेत दुर्लक्ष करण्यात आल्याचं आयोगानं म्हटलंय.

इतर बातम्या :

Elon Musk चा स्वॅगच भारी, आधी ट्विटरचे शेअर खरेदी, आता म्हणतो एडिट बटण पाहिजे

सलमान खानला दिलासा; पत्रकाराला धमकी प्रकरणी कोर्टात हजर राहण्यापासून सूट

Samruddhi Mahamarga : समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होणार, tv9मराठीला माहिती

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.