AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीच्या निकालासाठी दररोज आनलाईन मिटींग घ्या, 2 आठवड्यामध्ये निकष सांगा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

सुप्रीम कोर्टात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली, कोर्टानं केंद्राला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. (Supreme Court CBSE ICSE exam)

बारावीच्या निकालासाठी दररोज आनलाईन मिटींग घ्या, 2 आठवड्यामध्ये निकष सांगा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
सर्वोच्च न्यायालय
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jun 04, 2021 | 6:22 PM
Share

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी अ‌ॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला दोन आठवड्यामध्ये बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, असा अल्टिमेटम दिला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी देशातील आणि परदेशातील अभ्यासक्रमांचे प्रवेश महच्वाचे आहेत. तुम्ही तातडीनं निर्णय घ्या, गरज पडल्यास दररोज ऑनलाईन मिटिंग घ्या पण दोन आठवड्यामध्ये निर्णय जाहीर करा, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे. (Supreme Court gave two week time to Centre for making of class 12th result framework)

केंद्राकडून याचिका रद्द करण्याची मागणी

सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारकडून अ‌ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी ममता शर्मा यांची याचिका रद्द करण्याची मागणी केली. ममता शर्मा यांच्या याचिकेतील मागणी मंजूर झाली आहे, त्यांची याचिका रद्द करावी अशी मागणी केंद्राकडून करण्यात आली. मात्र, सुप्रीम कोर्टानं बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, अशी विचारणा केंद्राला केली. त्यावर निकाल कसा जाहीर करणार हे सीबीएसई ठरवेल, असं केंद्राकडून सांगण्यात आलं.

बारावीचा निकाल कसा लावणार सांगा? याचिका रद्द करु

सुप्रीम कोर्टानं बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासाठी निकष ठरवण्यात आले असतील तर कोर्टापुढं सादर करा, याचिका निकाली काढू असं म्हटलं. यावर आयसीएसईच्या वकिलांनी 4 आठवड्यांची वेळ मागितली. सुप्रीम कोर्टानं केंद्राची बाजू आणि आयसीएसईची बाजू ऐकून घेत 2 आठवड्यांची मुदत दिली. तुमची इच्छा असेल तर हे एका रात्रीत करु शकता.मात्र, दोन आठवड्यामध्ये निकालाचे निकष जाहीर करा. वेळ वाढवून देण्यासाठी युक्तिवाद करु नका, असं न्यायमूर्तींनी सांगितलं. न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्याकडे निर्णय घेण्यास वेळ होता, आता दोन आठवड्यामध्ये निकष जाहीर करा असं म्हटलं.

ममता शर्मा काय म्हणाल्या?

याचिकाकर्त्या ममता शर्मा यांनी अजून काही राज्य परीक्षा बोर्डांचा निर्णय झालेला नाही. राज्य बोर्डांनी सुद्धा बारावी परीक्षांसदर्भात एकसारखा निर्णय घ्यावा असं म्हटलं. यावर कोर्टानं बारावीचा निकाल जाहीर करण्याचे निकष सादर झाल्यावर याबाबत समजेल. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, ते सीबीएसईचे असोत, आयसीएसईचे असोत किंवा राज्य बोर्डांचं असोत, असं सुप्रीम कोर्ट म्हणाले.

केंद्र सरकारकडून सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द

सुप्रीम कोर्टाकडून मागून घेतलेल्या वेळेमध्ये केंद्र सरकारनं बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात या निर्णयाची माहिती दिली गेली.

संबंधित बातम्या

दहावी परीक्षांचं काय होणार, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाकडं महाराष्ट्राचं लक्ष, बारावी संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी

जॉन अब्राहमचा ‘मुंबई सागा’ चित्रपट अडचणीत, रा. स्व. संघाच्या बदनामी प्रकरणी निर्मात्यांना नोटीस

(Supreme Court gave two week time to Centre for making of class 12th result framework)

Follow Us
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत