AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

University College Reopen : विद्यापीठ,कॉलेज 1 ऑक्टोबर पासून सुरु करा , यूजीसीकडून गाईडलाईन्स जारी

विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या सूचनांप्रमाणं शैक्षणिक वर्ष 1 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येईल. यूजीसीनं या संदर्भात मार्गदर्शक सूचा देखील जारी केल्या आहेत.

University College Reopen : विद्यापीठ,कॉलेज 1 ऑक्टोबर पासून सुरु करा , यूजीसीकडून गाईडलाईन्स जारी
UCG
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 11:59 AM
Share

University College Reopen नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोगानं येत्या शैक्षणिक वर्षाचं कॅलेंडर जारी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदाही शैक्षणिक वर्ष उशिरा सुरु होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या सूचनांप्रमाणं शैक्षणिक वर्ष 1 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येईल. यूजीसीनं या संदर्भात मार्गदर्शक सूचा देखील जारी केल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करताना समन्वय ठेवण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांना निर्देश देण्यात आले आहेत. पहिल्या वर्षाचे प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

30 सप्टेंबरपर्यंत पहिल्या वर्षांचे  प्रवेश पूर्ण करा

विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या माहितीनुसार 2021-22 या शैक्षणिक सत्रामध्ये पदवी आणि इतर अभ्यासक्रमांचे पहिल्या वर्षांचे प्रवेश 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावे लागतील. तर, त्या मुदतीनंतर रिकाम्या राहिलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना 31 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश दिले जाऊ शकतात. देशातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी 1 ऑक्टोबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करावेत असे आदेश दिले आहेत.

परीक्षा 31 ऑगस्ट पूर्वी संपवा

विद्यापीठ अनुदान आयोगांनं विद्यापीठ आणि महाविद्यालयांना राहिलेल्या सर्व परीक्षा 31 ऑगस्ट पूर्वी संपवा, असे आदेश दिले आहेत.

12 वीचे निकाल 31 जुलैअखेर लागण्याची आशा

विद्यापीठ अनुदान आयोगानं बारावी परीक्षांचे निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर होतील, अशी आशा व्यक्त केली आहे. देशातील सर्व बोर्ड बारावीचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेंबर पूर्वी पूर्ण करावी, असं सांगण्यात आलं आहे. सेमिस्टर परीक्षा कधी घ्यायची संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठांना देण्यात आले आहेत.

इतर बातम्या:

Maharashtra SSC Result 2021: दहावी निकालाच्या वेबसाईट रात्री उशिरा पूर्ववत, बोर्डाच्या प्रयत्नांना यश, विद्यार्थी आनंदित

Maharashtra SSC Result 2021: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार; 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.