कमल हासन यांच्या चुकांची पुनरावृत्ती न करता थलपथीने कसे मिळवले यश
थलापथी म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार विजय पहिल्यांदाच निवडणूक लढवली असून विजय मिळवला आहे. पण विजयने कमल हासन यांनी केलेल्या त्या चुका टाळल्या असल्यामुळे विजय मिळाला असल्याचे म्हटले आहे.

तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. ‘थलापथी’ म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार विजय पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून, त्यांचा ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) हा पक्ष पदार्पणाच्या निवडणुकीतच धमाका करताना दिसत आहे. तमिळनाडूमध्ये सध्या दुर्मिळ अशी त्रिकोणी लढत पाहायला मिळत आहे. ताज्या वृत्तानुसार, TVK पक्ष आघाडीवर असून AIADMK आणि DMK प्रणित युती अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर दिसत आहेत. अंतिम निकाल येईपर्यंत चित्र बदलू शकते, परंतु थलापथी विजय यांनी पहिल्याच निवडणुकीत मैदानात आपला झेंडा रोवला आहे हे मात्र स्पष्ट आहे.
थलापथी विजय यांच्या या शानदार कामगिरीमागे एक स्पष्ट रणनीती दिसून येते, जी त्यांनी सिनेसृष्टीतून राजकारणात येऊन दिग्गज नाव बनलेल्या एम.जी. रामचंद्रन (MGR) आणि जयललिता यांच्याकडून शिकली असावी. कमल हासन यांना ज्या चुकांचा फटका बसला, त्या चूका विजय यांनी टाळल्याचे दिसून येते.
तमिळनाडू – इतिहासातून मिळलेली धोरणात्मक शिकवण
एम.जी. रामचंद्रन आणि जयललिता यांच्या अत्यंत यशस्वी राजकीय प्रवासापासून ते कमल हासन, खुशबू आणि विजयकांत यांच्या संमिश्र (पूर्णपणे यशस्वी न ठरलेल्या) प्रयत्नांपर्यंत, या राज्याने वारंवार पाहिले आहे की चित्रपट तारे पूर्णपणे राजकारणात सक्रिय होतात. MGR आणि जयललिता तर मुख्यमंत्रीही झाले होते. आता विजय यांनीही आपले नशीब आजमावले असून पहिल्याच प्रयत्नात ते नेत्रदीपक विजय मिळवताना दिसत आहेत.
विजय यांनी २०२४ मध्ये आपला राजकीय पक्ष ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) स्थापन केला आणि त्याच वेळी त्यांनी घोषणा केली की, ते चित्रपटांतून संन्यास घेऊन पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रित करतील. हीच गोष्ट त्यांना कमल हासन यांच्यापासून वेगळे करते. विजय यांच्या मते त्यांचा शेवटचा चित्रपट ‘जना नायकन’ असेल, जो जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार होता पण न्यायालयीन खटल्यामुळे अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही.
चित्रपटसृष्टी सोडण्यामागे विजय यांनी आपला तर्क स्पष्टपणे मांडले होते. त्यांच्या मते राजकारण हे असे काम नाही जे अर्धवट मनाने केले जावे. तमिळनाडूचे मतदार पूर्ण समर्पणास पात्र आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. राज्याचा राजकीय इतिहासही हीच गोष्ट खरी सिद्ध करतो. MGR आणि जयललिता यांनी सत्ता मजबूत करण्यापूर्वी चित्रपटांमधील सक्रिय काम सोडले होते. मात्र, कमल हासन यांची पद्धत, ज्यात ते चित्रपट आणि राजकारण दोन्ही एकाच वेळी करत आहेत, ती निवडणुकीत फारशी यशस्वी ठरली नाही. विजयकांत यांचा पक्ष वेगाने वर आला, पण संघटनेच्या पातळीवर कमकुवत पडला. तमिळ राजकारणात ‘अर्धवट’ प्रयत्नांना फारशी जागा नाही, हे विजय यांनी वेळीच ओळखले आहे.