16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
50 वर्षांपूर्वीचं रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीने परिधान केलेले 16 शृंगार. आजही हे गाणं अनेकजण ऐकतात. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे गाणं ठरलेलं खास.

सण-उत्सव आणि जश्नाचा माहोल असला की नटणे-सजणे आणि जुन्या गाण्यांची आठवण होणे साहजिकच आहे. अशाच एका सदाबहार गाण्याची आजही तितकीच चर्चा होते. अभिनेत्री रीना रॉय यांच्यावर चित्रित झालेले ‘जा रे जा ओ हरजाई’ हे गाणं तब्बल 50 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काली चरण’ या चित्रपटातील हे गाणं आहे. गाण्यात रीना रॉय गुलाबी रंगाचा लेहेंगा आणि त्यावर आकर्षक सोनेरी गोटा अशा पारंपरिक वेशात दिसतात. त्यांच्या 16 शृंगारातील रूपाने त्यावेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आजही पार्टी, लेडीज संगीत आणि विविध समारंभांमध्ये हे गाणं आवर्जून ऐकायला मिळते.
लता मंगेशकर यांच्या आवाजाची जादू
‘जा रे जा ओ हरजाई’ या गाण्याला लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजाची साथ लाभली आहे. या गाण्याचे गीतकार इंद्रजीत सिंह तुलसी तर संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी होती. रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर चित्रित झालेले हे गाणं आजही जुन्या हिंदी चित्रपटसंगीतातील एक क्लासिक म्हणून ओळखले जाते.
गाण्याच्या ओळींमध्ये प्रेमभंगाची वेदना आणि प्रियकराविषयीची नाराजी व्यक्त होते. ‘दिल दे कर मैं कर बैठी, दिल के दुश्मन से यारी’ या ओळी विशेष लोकप्रिय ठरल्या.
‘काली चरण’ ठरला होता मोठा हिट
सुभाष घई यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘काली चरण’मध्ये रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत डॅनी डेन्झोंगपा आणि प्रेमनाथ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. 1976 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या काळातील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता.
रीना रॉय यांनी 1972 मध्ये ‘जरूरत’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘मिलाप’, ‘जंगल में मंगल’, ‘नई दुनिया नए लोग’, ‘मधहोश’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले. ‘काली चरण’व्यतिरिक्त ‘नागिन’, ‘आशा’, ‘जानी दुश्मन’, ‘सनम तेरी कसम’, ‘अंधा कानून’, ‘विश्वनाथ’ आणि ‘अपनापन’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांच्या सौंदर्याबरोबरच अभिनयाचीही प्रेक्षकांवर मोठी छाप पडली. त्यामुळेच ‘जा रे जा ओ हरजाई’सारखी त्यांची गाणी आज अनेक दशकांनंतरही जुन्या आठवणींना उजाळा देतात.