AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदानासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली भारतात; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हे खूपच दु:खद….”

चक्क मतदान करायला एक अभिनेत्रीने न्यूझीलंडमधून  32 ते 36 तासांचा प्रवास करून भारतात येऊन मतदानाचा हक्क बजावला. तसेच तिने मतदानासाठी काही कारण नको असं म्हणतं मतदान करणे किती महत्त्वाचे आहे हेही समजावून सांगितलं आहे. 

मतदानासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली भारतात; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, हे खूपच दु:खद....
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 20, 2024 | 6:40 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करायला आज सकाळपासूनच सर्वांची आपापल्या भागात गर्दी होती. सामान्य असो किंवा सेलिब्रेटी असो सर्वांनीच त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यासाठी जे बाहेर राहतात त्या नागरिकांनीही आपल्या गावी, शहरांत जाऊन मतदान केलं. पण मतदानाचा हक्क बजवायला एक अभिनेत्री चक्क 32 ते 36 तास प्रवास करत न्यूझीलंडहून भारतात आली.

आज संपूर्ण राज्यभरात मतदान प्रक्रिया सुरू आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. त्यातच आता चर्चा होतेय अभिनेत्री गिरीजा ओकची जी मतादानाचं आपलं कर्तव्य पार पाडायला चक्क न्यूझीलंडहून प्रवास करून भारतात आली. गिरीजाने भारतात आल्यानंतर पुण्यात जाऊन मतदान केलं आहे.

अभिनेत्री गिरीजा ओक मतदान केल्यानंतर तिचा व्हिडीओ ही शेअर केला आहे. त्यात ती म्हणाली की, “मी मतदान केलं, असं लोक आजकाल एकमेकांना सांगतात. कारण इतर लोकं करत नाहीत. मला असं वाटतं, यात वेगळी काहीच गोष्ट नाही. प्रत्येकाने मतदान करायलाच हवं. मी आज न्यूझीलंडहून 32 तास प्रवास करून भारतात आले. त्यानंतर पुन्हा चार-पाच तासांचा प्रवास करून पुण्यात येऊन मतदानाला आले.”

गिरीजा ओक पुढे म्हणाली की, “प्रत्येकाची हीच अपेक्षा असते नेत्यांनी जी आश्वासने दिली आहेत, ती त्यांनी पूर्ण करावीत. मी ज्या विभागात राहते, तिथल्या सगळ्याचं उमेदवारांबद्दल मला बऱ्यापैकी माहीत आहे. त्यामुळे माझा मतदान करण्याचा निर्णय खूप क्लिअर होता. पण, मतदानाची टक्केवारी खूप दुःखद आहे” असं म्हणत गिरीजाने मतदारांची असलेली संख्या पाहाता खंत व्यक्त केली..

तसेच पुढे ती म्हणाली “ऐरवी हे बरोबर नाही ते बरोबर नाही हे बोलायला आवडतं. पण, मतदानाचा हक्क बजावला नाही तर बोलण्याचा हक्क आपल्याला नसून शकतो. तर मला असं वाटतं मतदानाचा हक्क आपण प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. कारण त्याला पर्याय नाहीये. या दिवशी खूप प्रेमाने ट्रीप प्लॅन करतात. हे मला अजिबात पटतं नाही. पण, याबद्दल लोकांना कसं सांगावं कळतं नाही. मी म्हटलं तसं 32 ते 36 तास प्रवास करून मी मतदानाला आले. मतदानासाठी काहीच कारण द्यायला नाही पाहिजे. तुम्ही मतदान करायलाच पाहिजे” असं म्हणत गिरीजाने प्रत्येकाला मतदान करणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, राज्यातील 288 विधानसभेच्या जागांसाठी मतदान झालं आहे. महायुती, महाविकास आघाडी या दोन युत्यांसह अनेक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. या अनेक पक्षातील एकूण 4 हजार 136 उमेदवारांचं भवितव्य अखेर मतदानाच्या माध्यमातून मतदाराने ठरवलं आहे, आणि ते कोण आहे हे निकाल्याच्या दिवशी समोर येईलच.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?