AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुल्लू मनाली येथे फिरायला गेलेल्या अभिनेत्रीची कार दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू, सेलिब्रिटींवर शोककळा

टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. टीव्ही अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यूची बातमी कळताना अनेकांना धक्का बसला आहे.

कुल्लू मनाली येथे फिरायला गेलेल्या अभिनेत्रीची कार दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू, सेलिब्रिटींवर शोककळा
| Updated on: May 24, 2023 | 11:16 AM
Share

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेतील अभिनेत्री वैभवी उपाध्याय ( Vaibhavi Upadhyaya Died ) आता या जगात नाही. अभिनेत्रीचा रस्ता अपघातात ( Actress Car Accident ) दुर्दैवी मृत्यू झालाय. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. आणखी एका अभिनेत्रीच्या निधनाचे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री वैभवी उपाध्याय तिच्या होणाऱ्या पतीसोबत कारने प्रवास करत होती. तीर्थन व्हॅलीमध्ये फिरायला जात असताना गाडीचे नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली. ज्यामध्ये अभिनेत्रीचा मृत्यू झालाय.

फॉर्च्युनर कारला अपघात

या अपघातात जय सुरेश गांधी याला ही दुखापत झाली असून, त्यांच्यावर बंजार रुग्णालयात उपचार करण्यात आले. वैभवी जय सुरेश गांधी यांच्यासोबत फॉर्च्युनर कारने प्रवास करत होती. पण वाहनाचे नियंत्रण सुटल्याने गाडी 50 फूट खाली कोसळली.

वैभवी उपाध्यायचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पण तोपर्यंत वैभवीचा मृत्यू झाला होता. जय सुरेश गांधी यांना यांना बंजार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Sarabhai Vs Sarabhai

टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा

टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीला ही बातमी कळताच मोठा धक्का बसला आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर वैभवीचा एक रील व्हिडिओ देखील शेअर केला आहे. याशिवाय अनेक जण तिच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध अभिनेते जेडी मजिठिया यांनीही वैभवीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.