AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्लू अर्जून कैदी नंबर…, रात्रभर जेलच्या कोठडीत जमिनीवर झोपला आणि…

Allu Arjun Arrest: 35 महिलेच्या मृत्यूला अल्लू अर्जुन जबाबदार... अटकेनंतर रात्रभर जेलच्या कोठडीत जमिनीवर झोपला..., अल्लू अर्जून कैदी नंबर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अल्लू अर्जुन प्रकरणाची चर्चा...

अल्लू अर्जून कैदी नंबर..., रात्रभर जेलच्या कोठडीत जमिनीवर झोपला आणि...
| Updated on: Dec 14, 2024 | 10:55 AM
Share

Allu Arjun Arrest: संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी अटक करण्यात आलेला तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन शनिवारी सकाळी तेलंगणा उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आला. अभिनेत्याला 13 डिसेंबर रोजी राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने अभिनेत्याल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अल्लू अर्जुन याला चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं. अखेर अल्लू अर्जुनने त्याचे वकील अशोक रेड्डी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला, तेथून अभिनेत्याला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मिळाला.

सांगायचं झालं तर, तेलंगणा उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतरही कागदोपत्री प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे अल्लू अर्जुनला एक तुरुंगात रात्र काढावी लागली. तुरुंगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन याचा कैदी क्रमांक 7679 होता. अभिनेता संपूर्ण रात्र काही न खाता-पीता जमीनीवर झोपलेला होता. अंडरट्रायल म्हणून पोलिसांनी त्याला मंजिरा बॅरेकमधील वर्ग-1च्या खोलीत ठेवलं होतं. अल्लू अर्जुनची सर्व माहिती कारागृहातील रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली होती.

संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचं निधन…

संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनेमासाठी प्रीमियर ठेवलं होतं. जेथे अभिनेता अल्लू अर्जुन देखील पोहोचला होता. तेव्हा अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. याचदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचं निधन झालं. याच प्रकरणी अभिनेत्याला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.

जे काही झालं त्यासाठी माफी मागतो – अल्लू अर्जुन

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन याने माध्यमांसोबत संवाद साधला… अभिनेता म्हणाला, ‘काळजी करण्याचं काही कारण नाही. जे काही झालं त्यासाठी मी माफी मागतो. माझ्या कायद्यावर विश्वास आहे. अपघात अनावधानाने झाला. मृत महिलेच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो. कायदेशीर सर्वकाही सुरु आहे, तर यावर मी वक्तव्य करणार नाही. लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे आज मी याठिकाणी आहे… मी सर्वांचे आभार व्यक्त करतो… मी पोलिसांना सहकार्य करेन.’ असं अभिनेता म्हणाला.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!