AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी राकेश कुमार यांच्या अंत्यविधीला जाणार नाही’; बिग बी असं का म्हणाले?

राकेश कुमार यांच्या अंत्यविधीला जाण्यास अमिताभ बच्चन यांचा नकार; कारण आलं समोर

'मी राकेश कुमार यांच्या अंत्यविधीला जाणार नाही'; बिग बी असं का म्हणाले?
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 13, 2022 | 6:38 PM
Share

मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांचे जवळचे मित्र आणि दिग्दर्शक राकेश कुमार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगद्वारे राकेश कुमार यांच्यासाठी भावना व्यक्त केल्या आहेत. राकेश कुमार यांच्या अंत्यविधीला न जाण्यामागचं कारणसुद्धा त्यांनी या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे.

‘आणखी एक दु:खाचा दिवस. आणखी एक सहकारी आपल्याला, खासकरून मला सोडून गेला. राकेश यांनी ‘जंजीर’साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून, प्रकाश मेहरा यांच्या इतर चित्रपटांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं. हेरा फेरी, खून पसीना, मिस्टर नटवरलाल, याराना यांसारखे चित्रपट त्यांनी इंडस्ट्रीला दिले. सेटवर आणि इतर कार्यक्रमांमध्ये, होळीच्या जल्लोषात ते आनंदाने सहभागी व्हायचे’, अशा शब्दांत बिग बींनी आठवणी सांगितल्या.

‘एकानंतर एक सर्वजण सोडून गेले. मात्र राकेश कुमार यांच्यासारखे लोक आपली छाप सोडून जातात, त्याला मिटवणं कठीण असतं. स्क्रीनप्ले आणि दिग्दर्शनाचं त्यांचं ज्ञान अफाट होतं. त्यांच्या त्यांच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास होता. आपल्या सहकलाकारांच्या कोणत्याही दु:खात ते खंबीरपणे साथ द्यायचे. त्यांची मदत करण्यासाठी तत्पर असायचे’, असं त्यांनी पुढे लिहिलं.

राकेश कुमार यांच्या अंत्यविधीला न जाण्यामागचं कारण सांगताना त्यांनी लिहिलं, ‘मी त्यांच्या अंत्यविधीला जाणार नाही. कारण राकेश यांना मी अशा परिस्थितीत बघू शकत नाही. राकेश यांनी त्यांच्या कल्पनांनी आणि चित्रपटांनी आमच्यासारख्यांना मोठं केलं. त्यांची खूप आठवण येईल.’

राकेश कुमार यांचं 10 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाने ग्रस्त होते.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.