AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा शो बंद झाला तर मी…’ अमिताभ बच्चन केबीसीच्या मंचावर भावूक अन् डोळ्यात अश्रू

अमिताभ बच्चन यांच्या "जाण्याची वेळ आली आहे" या व्हायरल ट्वीटनंतर चाहत्यांमध्ये चिंता पसरली होती. नंतर, केबीसीच्या सेटवर त्यांनी केलेले भावनिक वक्तव्यही चर्चेत आले. त्यावेळी ते शोमध्ये भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यांचं हे भावनिक वक्तव्य ऐकल्यानंतर  प्रेक्षकही भावूक झालेले पाहायला मिळाले. 

'हा शो बंद झाला तर मी...' अमिताभ बच्चन केबीसीच्या मंचावर भावूक अन् डोळ्यात अश्रू
| Updated on: Mar 08, 2025 | 11:36 AM
Share

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय होतात. तसेच त्यांनी केलेले ट्वीट असो किंवा एखादी पोस्ट असो. त्यात सर्वात सक्रिय असणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. बिग बी हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते त्यांच्या वर्कबद्दल असो किंवा त्यांच्या आयुष्यातील काही घडामोडी असो. काहीना काही ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतच असतात. मध्यंतरी त्यांचे एक ट्वीट प्रंचड व्हायरल झालं होतं. ” जाण्याची वेळ आली आहे”. यांच्या या ट्वीटची चर्चा फारच झाली होती. या ट्वीटमुळे चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती.

केबीसीच्या मंचावरील भाविनक किस्सा 

अभिनेते अमिताभ बच्चन यांचे करोडोंनी चाहते आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली किंवा कधी कोणत्या कार्यक्रमात ते भावूक होताना दिसले की, लगेचच चाहतेही थोडे भावनिक होतात. असाच एक किस्सा घडला केबीसच्या सेटवर . अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे मेगास्टार असून ते वयाच्या 82 व्या वर्षीही इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत आणि काम करत आहेत. अमिताभ सध्या ‘केबीसी 16’च्या सीझनचं सूत्रसंचालन करत आहेत. आता अमिताभ यांनी ‘कौन बनेगा करोडपती 16’ च्या मंचावर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

 ‘त्या दिवशी मी सुद्धा बंद होईन…’

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांकडे पाहिलं आणि म्हणाले की, ‘तुम्हीच आहात ज्यामुळे मला ऊर्जा मिळते.’ अमिताभ यांनी हे वाक्य उच्चारतात सर्वांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. पुढे अमिताभ बच्चन भावुक होऊन म्हणाले की, ‘ज्या दिवशी हा शो बंद होईल त्याच दिवशी मी सुद्धा बंद होईन’ अमिताभ यांचं वक्तव्य ऐकून सगळेच थक्क झाले. सर्वांचंच त्यांच्या या वक्तव्यामुळे मन हेलावलं. सर्व प्रेक्षकांनी त्यांना असं न बोलण्याची विनंती केली.

“भावूकतेनं त्यांच्या डोळ्यात पाणी”

पुढे अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘मी अत्यंत योग्य बोलतोय. शेवटी मी एक कलाकार आहे आणि त्यामुळे माझ्यातल्या कलाकाराला अशाच गोष्टी जिवंत ठेवतात. तुम्ही मोठ्या पडद्यावर मला बघता. मी जे काही करेल ते तुम्हाला प्रचंड आवडतं. तुम्ही त्या गोष्टीचं कौतुक करता. जोरजोरात टाळ्या वाजवता. तुमच्या टाळ्या माझ्यासाठी जेवणासारख्याच आहे.’ असं म्हणत त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच त्या व्यक्त करत असताना ते थोडे भावनिक झाले होते. तसेच भावूकतेनं त्यांच्या डोळ्यात पाणी आलेले पाहायला मिळाले.

‘रामायण’मध्ये लवकरच दिसणार 

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती 16’ होस्ट करत आहेत. ते 2024 मध्ये रजनीकांत स्टारर ‘वेट्टियां’ चित्रपटात दिसले होते. सध्या त्यांनी कोणत्याही नवीन चित्रपटाची घोषणा केलेली नाही, परंतु असं म्हटलं जात आहे की, ते नितेश तिवारीच्या ‘रामायण’ मध्ये दिसणार आहेत.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.