AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरदार सोडलं, जमीन विकली, आईविरोधात जाऊन फिल्म इंडस्ट्रीत केलं काम; ‘बाहुबली’चा कटप्पा सध्या काय करतो?

'बाहुबली' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. यामध्ये कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज सध्या काय करतात हे माहितीये का? या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाने प्रेक्षकांना चांगलंच सतावलं होतं.

घरदार सोडलं, जमीन विकली, आईविरोधात जाऊन फिल्म इंडस्ट्रीत केलं काम; 'बाहुबली'चा कटप्पा सध्या काय करतो?
अभिनेते सत्यराजImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 03, 2023 | 3:28 PM
Share

मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ हा चित्रपट अनेकांच्या चांगलाच लक्षात असेल. कारण या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट जरी दक्षिणात्य असला तरी हिंदीतही त्याचा प्रचंड बोलबाला पाहायला मिळाला होता. यामधल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज. सत्यराज यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. त्यांचं मूळ नाव रंगाराज सुबय्या असं आहे.

200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम

सत्यराज यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र राजामौलींच्या ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे त्यांना संपूर्ण देशभरात लोकप्रियता मिळाली. त्यांनी आतापर्यंत 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज जरी ते इंडस्ट्रीत यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जात असले तरी एकेकाळी त्यांनी बराच संघर्ष केला आहे. अभिनयात करिअर करण्यासाठी त्यांनी घरसुद्धा सोडून दिलं होतं. इतकंच नव्हे तर आईच्या विरोधात जाऊन त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती.

आईविरोधात जाऊन अभिनयक्षेत्रात काम

सत्यराज यांचं लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीत काम करायचं स्वप्न होतं. मात्र त्यांच्या आईला फिल्म इंडस्ट्री पसंत नव्हती. त्यांचे वडील पेशाने डॉक्टर होते आणि आई गृहिणी होती. सत्यराज यांना दोन लहान बहिणी आहेत. आईच्या विरोधानंतरही त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचं स्वप्न पाहणं बंद केलं नाही. त्यांनी घर सोडून आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. ‘कोडंबक्कम’ या पहिल्या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती. 1976 मध्ये प्रदर्शित झालेला हा तमिळ चित्रपट होता.

घर सोडलं, जमीन विकली

सत्यराज यांनी बॉटनी या विषयात बीएससीचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतरही त्यांना नोकरी मिळू शकली नव्हती. त्यांच्या हातात काम नव्हतं. तेव्हा त्यांना घराची जमीनसुद्धा विकावी लागली होती. अखेर एके दिवशी सत्यराज यांनी घर सोडून चेन्नई गाठलं. चेन्नईमध्ये ते काही वर्षांपर्यंत मिमिक्री करत होते. अखेर त्यांना एकेदिवशी कमल हासन यांचा चित्रपट मिळाला. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एनाक्कुल ओरुवन’ या चित्रपटातील त्यांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. त्यानंतर सत्यराज यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्येही भूमिका साकारली होती. ‘बाहुबली’नंतर सत्यराज कुठे आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्यांचा ‘सुपर ह्यूमन वेपन’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यामधील त्यांच्या कामाचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.