AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss फेम अर्चना गौतम हिला मारहाण, खडतर होतं आयुष्य, कशी आली प्रसिद्धी झोतात?

Bigg Boss | अर्चना गौतम काँग्रेस कार्यालयाबाहेर मारहाण, एकेकाळी करायची 'या' ठिकाणी काम, सत्य कळल्यानंतर तिला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता... कशी झाली अर्चना गौतम हिच्या मॉडेलिंग करियरची सुरुवात... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्चना गौमत हिची चर्चा सुरु आहे.

Bigg Boss फेम अर्चना गौतम हिला मारहाण, खडतर होतं आयुष्य, कशी आली प्रसिद्धी झोतात?
| Updated on: Sep 30, 2023 | 8:21 AM
Share

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : ‘बिग बॉस’मध्ये झळकल्यानंतर अनेक जण प्रसिद्धी झोतात येतात. पण बिग बॉसमधील काही स्पर्धकांनी भूतकाळात अनेक वाईट गोष्टींचा सामना केलेला असतो. पण ‘बिग बॉस’ मुळे अनेकांच्या करियरला एक वेगळी दिशा मिळते. ‘बिग बॉस १६’ फेम अर्चना गौतम हिच्यासोबत देखील असंच झालं आहे. ‘बिग बॉस १६’मध्ये वादग्रस्त वक्तव्यांमुळे अर्चना चर्चेत असायची. ‘बिग बॉस’ नंतर अर्चना ‘खतरों के खिलाडी’मध्ये देखील झळकली. आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केलेली अर्चना मेरठ याठिकाणी राहणारी आहे. देशभरात अर्चना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणून तिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात.

दरम्यान, अर्चना आणि तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली आहे. ज्यामुळे अर्चना चर्चेत आली आहे. काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार राहिलेल्या अर्चना गौतम हिला काँग्रेस कार्यालयातच प्रवेश नाकारण्यात आला. उलट काँग्रेस कार्यालयाबाहेर असलेल्या काही महिलांनी त्यांना धक्काबुक्की केली. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांचं अभिनंदन करण्यासाठी ती आली होती. पण काँग्रेस कार्यलयाबाहेर अर्चना आणि तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली.

कोण आहे अर्चना गौतम?

मीडिया रिपोर्टनुसार, अर्चन गौतम हिने लहानपणी आर्थिक परिस्थितीचा सामना केला असल्याचं, खुद्द अर्चना हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अर्चना लहानपणी देखील काम करायची. अर्चना गावात रिकामे सिलेंडर पोहोचवण्याचं काम करायची. ज्यासाठी तिला १० ते २० रुपये मिळायचे..

अर्चना गौतम हिची पहिली नोकरी..

अर्चना गौतम हिने सांगितलं की, २००८ मध्ये जेव्हा आमची परिस्थिती चांगली नव्हती, तेव्हा मी रिकामे सिलिंडर पोहोचवत असे, जे मी सायकल किंवा बाईकवरून करायचे. याशिवाय अर्चना गौतमने कॉल सेंटरमध्येही काम केलं आहे. अभिनेत्रीने सांगितले की, माझे पहिलं काम टेलिकॉलिंग होतं. ज्यासाठी मला ६ हजार रुपये मानधन मिळायचं.

पुढे अर्चना म्हणाली, ‘नोकरीमुळे मला पैसे मिळू लागले. पण इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे त्यांनी मला काढून टाकलं.’ अर्चना हिच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर, आयआयएमटीमधून पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्चना गौतम हिची चर्चा रंगली आहे.

अर्चना हिचा मॉडेलिंगचा प्रवास

जेव्हा अर्चना हिने रवी-किशन शोमध्ये भाग घेतला, तेव्हा अर्चना हिच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर यानंतर अर्चना गौतम हिने २०१८ मध्ये ‘मिस बिकिनी इंडिया’चा खिताब जिंकला. आज अर्चना हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील अर्चना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.