‘नशेत मी माझ्या लायकीवर…’, अक्षय कुमार याचं धक्कादायक वक्तव्य

| Updated on: Mar 05, 2024 | 3:23 PM

Akshay Kumar | अभिनेता अक्षय कुमार याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेता त्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगत असतो. आता अभिनेत्याने नशेत असल्यावर काय करतो... यावर मोठा खुलासा केला आहे.

नशेत मी माझ्या लायकीवर..., अक्षय कुमार याचं धक्कादायक वक्तव्य
Follow us on

मुंबई | 5 मार्च 2024 : अभिनेता अक्षय कुमार याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतात नाहीतर, भारताबाहेर परदेशात देखील अक्षय याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणून अक्षय याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहचे देखील उत्सुक असतात. एक शोमध्ये अक्षय याने त्याच्या दारू पिण्याच्या सवयीबद्दल सांगितलं होतं. ‘नशेत असताना मी माझ्या लायकीवर येतो…’ असं वक्तव्य खुद्द अक्षय याने केलं होतं.

अक्षय कुमार याने एका शोमध्ये मोठा खुसाला केला होता. खिलाडी कुमारने दुसऱ्या तिसऱ्या शोमध्ये नाहीतर, अभिनेता सलमान खान याच्या ‘दस का दम’ शोमध्ये . ‘नशेत असताना मी माझ्या लायकीवर येतो…’ असं अभिनेता म्हणाला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय याची चर्चा रंगली आहे.

अक्षय कुमार म्हणाला, ‘मी थोडी वाईन जरी प्यायलो तरी मला नशा चढते. इतर लोकं नशेत मोठ-मोठ्याने हासतात, गाणी गातात, रागात काहीही बोलतात, कुठेही पडतात… पण मी विचित्र आहे. मी नशेत असतो तेव्हा जेवण बनवतो. नशेत असताना मी माझ्या लायकीवर येतो…’

हे सुद्धा वाचा

‘नशेत बनवलेलं माझी पत्नी खाते की नाही यावर दोखील माझं लक्ष असतं. मी बनवलेलं तिला आवडलं नसलं तरी, मी तिला म्हणतो नाही तुला खावं लागेल… मी बनवलं आहे. मी पराठे उत्तम बनवू शकतो.’ अक्षय कुमार यांच्या वक्तव्यावर सलमान खान देखील होकार देतो..

सलमान खान म्हणतो, ‘अक्षय याला वेगवेगळे पदार्थ बनवता येतात.’सांगायचं झालं तर, सलमान आणि  अक्षय यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. चाहत्यांना दोघांची जोडी देखील प्रचंड आवडते. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान – अक्षय चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. आजही चाहत्यांच्या मनात असलेली दोघांची क्रेझ कमी झालेली नाही.

आजही चाहते सलमान – अक्षय यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. अक्षय लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमातून अनेक वर्षांनंतर अभिनेत्री रवीना टंडन, अक्षय एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

सिनेमात अक्षय, रवीना यांच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, मानुषी छिल्लर, दिशा पाटनी, अनिल कपूर, संजय दत्त, सुनिल शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.