AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda जेव्हा रात्रीत झाला मालामाल; पैशांनी भरलं घर, अकाऊंट… म्हणाला, ‘शंभर ट्रक…’

गरिबी अनुभवलेला गोविंदा एका रात्रीत कसा झाला मालामाल, घरात आणि अकाऊंटमध्ये बक्कळ पैशांचं करायचं तरी काय? असा अभिनेत्याला पडला प्रश्न आणि...

Govinda जेव्हा रात्रीत झाला मालामाल; पैशांनी भरलं घर, अकाऊंट... म्हणाला, 'शंभर ट्रक...'
| Updated on: Apr 18, 2023 | 10:32 AM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत, ज्यांनी आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला. एवढंच नाही तर, झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी बऱ्याचवेळा खस्ता खाल्ला. करियरच्या शिखरावर चढत असताना अपयशाचा देखील सामना केला, पण कधीही मागे वळून पाहिलं नाही. अशाचं अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे गोविंदा. गोविंदा आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसला तरी अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. आजही अनेकदा महत्त्वाच्या ठिकाणी किंवा कार्यक्रमांमध्ये गोविंदाची एक झलक चाहत्यांना पाहता येते. गोविंदाकडे आज संपत्ती, प्रसिद्धी सर्व काही आहे, पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्याने गरिबी अनुभवलेली आहे.

गोविंदा ९० च्या दशकाची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. ही गोष्ट अभिनेत्याच्या प्रत्येक चाहत्याला माहिती आहे. शिवाय गोविंदाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा निर्माते आणि दिग्दर्शक यांनी गोविंदाच्या घराबाहेर रांग लावली. एकाच वेळी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्यासाठी अनेक ऑफर आल्या आणि एका रात्रीत अभिनेता मालामाल झाला.

गोविंदाने एका चॅट शोमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. ‘आमचं लाहनपण प्रचंड गरिबीत गेलं. आम्हाला इतक्या पैशांची सवय नव्हती. एका रात्री मी माझ्या भावाला बोलावलं आणि त्याला पैसे आणि सर्व अकाऊंड दाखवले. इतके पैसे पाहून आम्ही प्रचंड आनंदी झालो..’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘बक्कळ पैसे आले, पण त्या पैशांचं काय करायचं हे आम्हाला माहिती नव्हतं. कोणालाच काहीच कल्पना नव्हती की, कमावलेल्या पैशांचं काय करणार… ‘ अखेर गोविंदाला एक विचार आला आणि त्या पैशांचं काय करयाचं हे अभिनेत्याने भावाला सांगितलं.

अभिनेत्याने भावाला सांगितलं, ‘पप्पू… चल आपण १०० रिक्षा खरेदी करू.’ पण अभिनेत्याच्या भावाने यासाठी नकार दिला आणि म्हणाला, ‘हा आपल्या योग्यतेचा व्यवसाय नाही…’ काही वर्षांनंतर अभिनेता प्रचंड श्रीमंत झाला. ‘सुरुवाती पासून आपण गरिबी पाहिली आहे, आता उंच उजडण्याची गरज आहे…’ असं गोविंदाचा भाऊ म्हणाला…

कोणत्याही सिनेमाला नकार देवू नको असा सल्ला गोविंदाच्या भावाने दिला. पण कालांतराने काही सिनेमांना नकार द्यावा लागला, कारण वेळ नव्हता. अभिनेत्याला सिनेमे मिळत होते, पैसे वाढत होते… तरी देखील एवढ्या पैशांचं काय करायचं? हे अद्यापही अभिनेता आणि कुटुंबाला कळालं नव्हतं.

गोविंदा म्हणाला, ‘पप्पू चल १०० ट्रक खरेदी करू…’ पण यासाठी देखील अभिनेत्याच्या भावाने नकार दिला. अभिनेता म्हणाला, ‘तेव्हा एका वर्षात १० सिनेमे करायचो. सर्व सिनेमांना यश मिळत नव्हतं. पण लोकप्रियता वाढत होती. मला काम आणि पैशांची कोणतीही कमी भासत नव्हती…’ असं देखील अभिनेता म्हणाला…

एका काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर अभिनेता गोविंदा, सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या अभिनेत्यांचं राज्य होतं. आता बॉलिवूडमध्ये अनेक नवीन अभिनेत्यांनी पदार्पण केलं असलं तरी, ९० च्या दशकातील अभिनेत्यांची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अभिनेता गोविंदा आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसला तरी, त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...