AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमच्या देशाला तुझी गरज नाही’, प्रसिद्ध अभिनेत्याने असं काय केलं, ज्यामुळे नेटकऱ्यांनी साधला निशाणा

कायम वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्याला नेटकरी आज म्हणाले, 'आमच्या देशाला तुझी गरज नाही'... अभिनेता असं काय म्हणाला ज्यामुळे त्याने केलेल्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा...

'आमच्या देशाला तुझी गरज नाही', प्रसिद्ध अभिनेत्याने असं काय केलं, ज्यामुळे नेटकऱ्यांनी साधला निशाणा
| Updated on: Aug 15, 2023 | 8:40 AM
Share

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : भारत देशातील प्रत्येक नागरिक आहे ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. सोशल मीडियावर देखील स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशाला संबोधीत करत आहेत. एवढंच नाही तर दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक आवाहन केलं होतं. मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियानात सर्वांना सहभागी होण्यासाठी आवाहन केलं होतं.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत भारतीय नागरिकांना एकता आणि राष्ट्रवादाच्या भावनांना दुजोरा देण्यासाठी प्रत्येकाला स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरील डीपी बदलण्याचं आवाहन केलं होत. मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला नागरिकांनी पाठिंबा दिला. पण बॉलिवूडच्या एक अभिनेत्याने मात्र ‘हर घर तिरंगा’ अभियानावर टीका केली आहे.

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट

पंतप्रधान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी बदलला आणि ट्वीट करत म्हणाले की, “हर घर तिरंगा अभियान… या भावनेने आपल्या सोशल मीडिया खात्यांचा अकाउंटवरील डीपी बदलू… जे आपला देश आणि आपल्यातील बंध अधिक दृढ करेल.” मोदी यांचं ट्विट तुफान व्हायरल झाला.

अभिनेका केआरके याने ट्विट करत ‘हर घर तिरंगा’ अभियानावर टीका केली आहे. ‘प्रत्येक घरात तिरंग्याऐवजी, प्रत्येक घरात भोजन किंवा प्रत्येक घरात वीज आणि पणी साजरा झाला असता.. तर काय अडचण होती?’ असं ट्विट अभिनेत्याने केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

कमाल राशिद खान याच्या ट्विटवर सोशल मीडिया युजर्सन प्रतिक्रिया दिली आहे. एक युजर म्हणाला, ‘सरळ सरळ बोल तुला तिरंग्याचा तिरस्कार आहे…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आमच्या देशाला तुझी गरज नाही.’ अन्य एक युजर म्हणाला, ‘तिरंग्याचं महत्त्व काय आहे… हे तू समजू शकत नाही… ‘

केआरके कायम अनेक मुद्द्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचं मत व्यक्त करत असतो. ज्यामुळे अनेकदा अभिनेता वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला आहे. आता अभिनेत्याने ‘हर घर तिरंगा’ अभियानावर ट्वीट केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.