AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनुपम खेर नाराज? पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर केले मोठे भाष्य

अनुपम खेर यांनी एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. अनुपम खेर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनुपम खेर यांनी नुकताच अत्यंत मोठे भाष्य केले आहे.

अनुपम खेर नाराज? पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर केले मोठे भाष्य
| Updated on: Oct 28, 2023 | 6:41 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. नुकताच आता अनुपम खेर यांनी आपल्या मनातील खदखद अखेर व्यक्त केलीये. अनुपम खेर हे म्हणाले की, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार न मिळाल्याने नाराज होण्याचा अधिकार नक्कीच माझ्याकडे आहे. द काश्मीर फाईल्स चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, द काश्मीर फाईल्स चित्रपटात माझी भूमिका ही पूर्णपणे भावपूर्ण आहे. मला तिथे भावना दाखवण्याची अजिबात गरज नाही पडली.

मी माझ्या भावनांमध्ये सत्य आणण्याचा प्रयत्न करतो. पुढे अनुपम खेर म्हणाले, मुळात म्हणजे ज्या लोकांना हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले ते पूर्णपणे त्याचे हकदार आहेत. मी ज्यावेळी पुष्पा हा चित्रपट थिएटरमध्ये बघितला तेंव्हाच मी अल्लू अर्जुन याचे काैतुक केले. अनुपम खेर हे सर्वकाही पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना दिसले.

अनुपम खेर हे कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. विषय कोणताही असो आपले मत स्पष्टपणे मांडताना कायमच दिसतात. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर सर्वात अगोदर पोस्ट शेअर करत निधनाची माहिती दिली. सतीश कौशिक आणि अनुपम खेर हे खूप जुने मित्र आहेत.

सतीश कौशिक यांच्या मुलीसोबत रिल्स तयार करताना अनुपम खेर हे दिसले. अनुपम खेर यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अनुपम खेर त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मुळात म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित झाल्यानंतर अनुपम खेर यांनी एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यादीमध्ये द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला अनेक पुरस्कार हे मिळाले. मात्र, द काश्मीर फाईल्स चित्रपटासाठी बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा अनुपम खेर यांना मिळाला नाही. बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार अनुपम खेर यांनाच मिळेल, असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात अल्लू अर्जुन याला पुरस्कार मिळाला.

Follow Us
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.