AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृष्णा अभिषेक याचा ‘तो’ मोठा खुलासा, मामा गोविंदाबद्दल म्हणाला, आता…

अभिनेता गोंविदा याच्या पायाला काही दिवसांपूर्वीच चुकून गोळी लागल्याची घटना घडली. त्यानंतर गोविंदावर शस्त्रक्रिया करण्यात आला. आता नुकताच गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने मोठा खुलासा केलाय. कृष्णा अभिषेक हा गोविंदाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला होता.

कृष्णा अभिषेक याचा 'तो' मोठा खुलासा, मामा गोविंदाबद्दल म्हणाला, आता...
Krishna Abhishek
| Updated on: Oct 23, 2024 | 4:12 PM
Share

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्या पायाला काही दिवसांपूर्वीच गोळी लागली. बंदूक साफ करत असताना गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची हैराण करणारी घटना काही दिवसांपूर्वीच पहाटे घडली. ज्यावेळी गोविंदाच्या पायाला गोळी लागली, त्यावेळी त्याची पत्नी घरात नव्हती. गोविंदाच्या मुलीने त्याला लगेचच रूग्णालयात नेले. आता काही आठवडे गोविंदाला आराम करण्यास डॉक्टरांनी सांगितले. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आलीये. गोविंदाला गोळी लागल्यानंतर सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. रूग्णालयातून घरी जाताना गोविंदा मीडियासमोर येऊन बोलताना दिसला.

गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक हा मामा गोविंदाला गोळी लागल्यानंतर खूप जास्त चिंतेत दिसला. ज्यावेळी गोविंदाला गोळी लागली त्यावेळी तो कामानिमित्त ऑस्टेलियाला होता. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने चिंता व्यक्त केली होती. हेच नाही तर आपले काम अर्ध्यामध्ये सोडूनही त्याची येण्याची तयारी होती.

कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह ही गोविंदाला पाहण्यासाठी लगेचच रूग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर मामाच्या तब्येतीचे अपडेट तिनेच कृष्णा अभिषेकला दिले. आता ऑस्टेलियावरून परतल्यानंतर सर्वात अगोदर कृष्णा अभिषेक हा गोविंदाच्या घरी पोहोचला. याबद्दलची माहिती स्वत: कृष्णा अभिषेक याने दिलीये.

नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये कृष्णा अभिषेक याने म्हटले की, मी ऑस्टेलियावरून आल्यावर सर्वात अगोदर मामा गोविंदाच्या घरी गेलो. विशेष म्हणजे मी तब्बल सात वर्षांनी त्यांच्या घरी गेलो. साधारणपणे मी चीची मामा (गोविंदा) सोबत एक तास होतो. आम्ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. आमच्यामध्ये इतक्या दिवसांपासून असलेल्या जुन्या वादावर अजिबात भाष्य केले नाही.

टीनाला मी जवळपास सात वर्षांनी भेटलो आम्ही भावूक झालो. प्रत्येक कुटुंबामध्ये काहीतरी गोष्टी घडतात आणि त्यानंतर जेंव्हा परत सर्वजण एकत्र येतात त्यालाच कुटुंब म्हणतात. तिथे देखील कोणीही जुन्या वादाबद्दल अजिबात बोलले नाही. मामीसोबत भेट झाली नाही कारण ती बिझी होती. आता तर काय नेहमीच मामाकडे जाईल मामीसोबत कायमच भेट होत राहिल. सात वर्षांचा वणवास संपल्याचे देखील कृष्णाने म्हटले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत