सुपरस्टारवर एकतर्फी प्रेम करणं अभिनेत्रीला पडलं महागात; करिअर संपलं, नैराश्यात अडकून नाकारलं लग्न

सत्तरच्या दशकातील ही अभिनेत्री एका बॉलिवूड सुपरस्टारच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र तिचं हे प्रेम एकतर्फीच होतं. या एकतर्फी प्रेमाखातर तिने आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्याच्या निधनानंतर ती नैराश्यात गेली.

सुपरस्टारवर एकतर्फी प्रेम करणं अभिनेत्रीला पडलं महागात; करिअर संपलं, नैराश्यात अडकून नाकारलं लग्न
Sulakshana Pandit, Sanjeev KumarImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 7:05 PM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांच्या प्रेमकहाण्या चवीने चघळल्या जातात. एकाच चित्रपटात किंवा मालिकेत काम करताना जेव्हा कलाकार एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात, तेव्हा अनेकदा त्यांच्यात प्रेमाची कळी उमलते. अशावेळी काहींच्या प्रेमाचा प्रवास हा लग्नापर्यंत पोहोचतो. तर काहींच्या नात्यात त्या आधीच दुरावा आला. इंडस्ट्रीत असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी एकतर्फी प्रेमातून कधीच लग्न केलं नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सुलक्षणा पंडित. 70 च्या दशकातील अभिनेत्री सुलक्षणा पंडितने एकतर्फी प्रेमामुळे कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. सुलक्षणाचं हे प्रेम बॉलिवूडमधल्याच एका सुपरस्टारवर होतं. तिने तिच्या करिअरमध्ये जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. मात्र तरीही ती इंडस्ट्रीतील कमनशिबी अभिनेत्री ठरली.

सुपरस्टारवर जडलं प्रेम

रिपोर्ट्सनुसार, सुलक्षणा पंडित अभिनेते संजीव कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र संजीव कपूर यांनी तिच्याशी लग्न केलं नाही. कारण त्यांचं दुसऱ्या अभिनेत्रीवर प्रेम होतं. ‘उलझन’ या चित्रपटात सुलक्षणा आणि संजीव कपूर यांनी एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती त्यांच्या प्रेमात पडली. तर दुसरीकडे संजीव कपूर हे दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात होते. त्यांनी त्या अभिनेत्रीला दोन वेळा प्रपोजसुद्धा केलं होतं. मात्र तिने संजीव कपूर यांचं प्रपोजल नाकारलं होतं. यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले आणि आयुष्यभर लग्न न करताच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या याच निर्णयाचा परिणाम सुलक्षणा यांच्यावरही झाला आणि तिनेसुद्धा कधीच कोणाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

एकतर्फी प्रेमातून लग्नच केलं नाही

1985 मध्ये संजीव कुमार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तेव्हा ते फक्त 47 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर सुलक्षणा नैराश्यात गेली आणि तिने लग्न केलंच नाही. सुलक्षणाची बहीण विजेता पंडितने एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की संजीव कुमार यांच्या निधनानंतर ती पूर्णपणे खचली आणि तेव्हापासूनच ती नैराश्याच्या गर्तेत अडकली.

हे सुद्धा वाचा

2006 मध्ये विजेता पंडितने सुलक्षणाला तिच्या घरी आणलं. मात्र सुलक्षणाने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतलं. ती कोणाचीच भेट घेत नव्हती किंवा कोणाशीच बोलत नव्हती. एकेदिवशी बाथरुममध्ये पाय घसरून तिच्या पायाला दुखापत झाली. यानंतर तिच्यावर चार सर्जरी झाल्या, मात्र त्यामुळे आजही सुलक्षणाला नीट चालता येत नाही.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.