AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anurag Kashyap | अनुराग कश्यप यांचा मोठा खुलासा, हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्याचे सांगितले कारण

अनुराग पुढे म्हणाले की, तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपट त्यांच्या संस्कृतीशी जोडलेले आहेत. पण हिंदी चित्रपटांबाबत तसे नाही. आता हिंदी चित्रपटसृष्टीत असे चित्रपट निर्माते आहेत ज्यांना हिंदीही बोलता येत नाही आणि ही गोष्ट त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसून येते. जे इंग्रजी बोलतात आणि त्यांना हिंदी देखील येत नाही ते हिंदी चित्रपट बनवत आहेत.

Anurag Kashyap | अनुराग कश्यप यांचा मोठा खुलासा, हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्याचे सांगितले कारण
| Updated on: Jul 28, 2022 | 11:14 AM
Share

मुंबई : अनुराग कश्यप (Anurag Kashyap) त्याच्या आगामी ‘दोबारा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनुराग कश्यपच्या या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. दोबारा चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी (Trailer launch) अनुराग कश्यपने हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर का सातत्याने फ्लॉप होत आहेत, याचे मुख्य कारण सांगितले आहे. हिंदी चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण देताना अनुराग कश्यप म्हणाले की, आजकाल हिंदी चित्रपटांना (Hindi movies) मूळच राहिले नाही, कारण चित्रपट निर्माते प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी त्यांच्या शैलीच्या बाहेर जात आहेत.

अनुराग कश्यप यांनी हिंदी चित्रपटांबद्दल केला मोठा खुलासा

अनुराग पुढे म्हणाले की, तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपट त्यांच्या संस्कृतीशी जोडलेले आहेत. पण हिंदी चित्रपटांबाबत तसे नाही. आता हिंदी चित्रपटसृष्टीत असे चित्रपट निर्माते आहेत ज्यांना हिंदीही बोलता येत नाही आणि ही गोष्ट त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसून येते. जे इंग्रजी बोलतात आणि त्यांना हिंदी देखील येत नाही ते हिंदी चित्रपट बनवत आहेत. मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्माते जेव्हा त्यांच्या शैलीतील चित्रपट बनवतील तेंव्हाच ते चित्रपट हिट ठरतील.

अनुराग कश्यपच्या दोबारा चित्रपटाचे ट्रेलर लाँच

संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडी आणि भूल भुलैया 2 याचीच उत्तर उदाहरणे आहेत, असेही अनुराग म्हणाले आहेत. हे दोन्ही हिंदी चित्रपट आहेत कोरोनानंतरच रिलीज झाले आहेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केलीयं. दोबारा चित्रपटातून अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू ही दमदार जोडी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. दोबारा हा 2018 सालच्या स्पॅनिश चित्रपट मिराजचा रिमेक आहे. हा चित्रपट 19 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....