AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Richa Chadda | कधी ‘नगमा खातून’ तर कधी ‘भोली पंजाबन’ बनून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, वाचा अभिनेत्री रिचा चड्ढाबद्दल…

रिचाने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सशक्त भूमिका केल्या आहेत आणि आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रिचा तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अली फजलसोबतच्या नात्याबद्दलही चर्चेत असते. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Happy Birthday Richa Chadda | कधी ‘नगमा खातून’ तर कधी ‘भोली पंजाबन’ बनून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, वाचा अभिनेत्री रिचा चड्ढाबद्दल...
Richa Chadda
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 18, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : 18 डिसेंबर 1986 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेली रिचा चड्ढा (Richa Chadda) आज तिचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. रिचाने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सशक्त भूमिका केल्या आहेत आणि आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रिचा तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अली फजलसोबतच्या नात्याबद्दलही चर्चेत असते. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आज ऋचाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टींबद्दल सांगणार आहोत…

रिचाचा जन्म पंजाबमध्ये झाला, पण खलिस्तान चळवळीची परिस्थिती पाहता तिचे आई-वडील दिल्लीत स्थायिक झाले. त्यावेळी रिचा फक्त दीड वर्षांची होती. यानंतर रिचाचे संपूर्ण बालपण दिल्लीतच गेले. तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीतच पूर्ण झाले. रिचा सोशल मीडियामध्ये पीजी डिप्लोमा करण्यासाठी मुंबईत आली होती. रिचाच्या पालकांची इच्छा होती की, तिने टीव्ही पत्रकार व्हावे, मात्र नशिबाने रिचासाठी दुसरा मार्ग निवडला होता.

‘नगमा खातून’मुळे मिळाली प्रसिद्धी!

मुंबईत आल्यानंतर रिचाने मॉडेलिंग सुरू केले आणि थिएटर करायला सुरुवात केली. यानंतर ती ‘ओये लकी, लकी ओये!’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर कमाल दाखवली नाही, पण रिचाचा अभिनय सर्वांनाच आवडला. मात्र, अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये ‘नगमा खातून’ ही व्यक्तिरेखा साकारून रिचा सर्वांची आवडती बनली. यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही रिचाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

‘मसान’ चित्रपटाचे कौतुक!

यानंतर रिचाला एकापेक्षा एक चित्रपट मिळाले ज्यात ‘फुक्रे’, ‘शॉर्ट्स’ आणि ‘राम-लीला’ यांचा समावेश आहे. रिचाने ‘फुकरे’मध्ये ‘भोली पंजाबन’ बनून लोकांची मने जिंकली. तर, तिने ‘राम लीला’मध्ये दीपिकाच्या वहिनीची भूमिका साकारून समीक्षकांची मने जिंकली. 2015 मध्ये आलेल्या ‘मसान’ चित्रपटासाठी रिचाने सर्वाधिक कौतुक मिळवले होते. या चित्रपटासाठी रिचाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. ‘मसान’ हा चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता, जिथे हा चित्रपट दोन पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

लवकरच अडकणार लग्नबंधनात!

रिचा तिच्या चित्रपटांसोबतच अभिनेता अली फजलसोबतच्या नात्याबद्दलही चर्चेत आहे. अली आणि रिचा यांची भेट ‘फुक्रे’ चित्रपटाच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. यानंतर त्यांचे प्रेम हळूहळू बहरले आणि 2019 मध्ये रिचाच्या वाढदिवशी अलीने तिला लग्नासाठी प्रपोज केले. रिचाने अलीला होकार दिला आणि या वर्षी एप्रिलमध्ये दोघे लग्न करणार होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ते होऊ शकले नाही. आता दोघेही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र, लवकरच हे जोडपे त्यांच्या चाहत्यांना लग्नाची गोड बातमी सांगतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?