कंगना रनौतने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला म्हटले ‘डिजास्टर’, करण जोहर आणि अयान मुखर्जीवरही साधला निशाना…

| Updated on: Sep 10, 2022 | 10:00 AM

कंगनाने करण जोहरसोबतच अयान मुखर्जीवरही निशाना साधलायं. कंगना म्हणाली की, अयान मुखर्जीला जीनियस म्हणणाऱ्या लोकांना अगोदर जेलमध्ये टाकायला हवे. ब्रह्मास्त्र चित्रपट तयार करण्यासाठी अयान मुखर्जीला तब्बल 12 वर्ष लागली आहेत.

कंगना रनौतने ब्रह्मास्त्र चित्रपटाला म्हटले ‘डिजास्टर’, करण जोहर आणि अयान मुखर्जीवरही साधला निशाना...
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या बेधडक बोलण्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना आणि वाद हे समिकरण बॉलिवूडमध्ये अत्यंत जुने आहे. कंगनाच्या टार्गेटवर नेहमीप्रमाणे करण जोहर (Karan Johar) आहे. मात्र, यावेळी अजून एका नावाचा समावेश झाला असून कंगनाने करणसोबतच अयान मुखर्जीवरही जोरदार टिका केलीयं. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळतोयं. काहीजण चित्रपट भारी असल्याचे म्हणत आहेत, तर काही जणांनी चित्रपटाकडून जेवढ्या अपेक्षा होत्या. त्या तुलनेत चित्रपट फेल असल्याचे बहुतांश समीक्षकांनी म्हटले आहे.

600 कोटी रूपये जळून राख झाल्याचे कंगनाने म्हटले…

रणबीर आणि आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटासंदर्भात कंगना रनौतने एक पोस्ट शेअर केलीयं. यामध्ये कंगनाने दिग्दर्शक अयान मुखर्जीचे 600 कोटी रूपये जळून राख झाल्याचे म्हटले आहे. कंगनाने ही पोस्ट तिच्या स्टोरीवर इन्स्टाग्रामवर शेअर केलीयं. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, करण जोहरसारख्या लोकांनी त्यांच्या वागणुकीकडे नक्कीच लक्ष द्यायला हवे. करणला चित्रपटापेक्षाही अधिक लोकांच्या सेक्स लाईफमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. यावेळी तर करणने चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चालण्यासाठी साऊथच्या कलाकारांकडे भिक मागितलीयं.

हे सुद्धा वाचा

करण जोहरने साऊथच्या कलाकारांकडे मागितली भिक- कंगना

कंगनाने करण जोहरसोबतच अयान मुखर्जीवरही निशाना साधलायं. कंगना म्हणाली की, अयान मुखर्जीला जीनियस म्हणणाऱ्या लोकांना अगोदर जेलमध्ये टाकायला हवे. ब्रह्मास्त्र चित्रपट तयार करण्यासाठी अयान मुखर्जीला तब्बल 12 वर्ष लागली आहेत. या चित्रपटासाठी त्याने 400 दिवसांपेक्षा जास्त दिवस शूटिंग केले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट तयार करण्यासाठी अयानला तब्बल 600 कोटी लागले असून आता हे सर्व पैसे वाया गेल्याचे देखील कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.