AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द काश्मीर फाईल्स’च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विवेक आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांच्याविरोधात शूटिंगच्या शेवटच्या दिवशी फतवा काढण्यात आला.

'द काश्मीर फाईल्स'च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा
The Kashmir Files Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 14, 2022 | 12:43 PM
Share

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विवेक आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांच्याविरोधात शूटिंगच्या शेवटच्या दिवशी फतवा काढण्यात आला. खुद्द पल्लवी यांनी याविषयीची माहिती दिली. पल्लवी या चित्रपटाच्या निर्माती आहेत आणि त्यांनी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकासुद्धा साकारली आहे. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

शूटिंगदरम्यान आलेल्या अडचणी

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट जरी कमी बजेटमध्ये आणि मोजक्या प्रमोशन्सच्या आधारावर बनवण्यात आला असला तरी बॉक्स ऑफिसवर त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पल्लवी यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या आव्हानांबद्दल सांगितलं. ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “शूटिंग हा संपूर्ण प्रवासातील खूप छोटा भाग होता. कथेसाठी केलेला रिसर्च, लोकांशी बोलणं, चित्रपटासाठी पैसा मिळवणं, कलाकारांना शोधणं हे सर्वकाही खूप आव्हानात्मक होतं.”

काश्मीरमध्ये चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी पल्लवी आणि विवेक अग्निहोत्रींविरुद्ध फतवा काढण्यात आला होता, असं त्यांनी पुढे सांगितलं. “शूटिंग हा सर्वांत सोपा भाग होता. आम्ही या चित्रपटाला समर्पित केलेल्या चार वर्षांमध्ये शूटिंगला फक्त एक महिना लागला. आम्ही काश्मीरमध्ये शूटिंग करत असताना आमच्या नावावर फतवा निघाला. जेव्हा फतवा काढण्यात आला तेव्हा आम्ही सुदैवाने शेवटच्या सीनचं शूटिंग करत होतो. मी विवेकला म्हणाले, “चला पटकन हा सीन पूर्ण करून विमानतळाकडे जाऊ. आता काही बोलू नको, आधी आपण शूट पूर्ण करू.” कारण आम्हाला त्याठिकाणी जाण्याची दुसरी संधी मिळणार नव्हती. आम्ही आधी तो सीन पूर्ण केला आणि मी काही लोकांना हॉटेलमध्ये पाठवलं. त्यांना पॅकिंग करून तिथून निघण्यास सांगितलं. शूटिंग करताना हे सर्वांत मोठं आव्हान आमच्यासमोर होतं”, असं पल्लवी म्हणाल्या.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने 27.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. देशातील निवडक थिएटर्समध्येच हा चित्रपट प्रदर्शित होऊनसुद्धा केलेली कमाई ही खूपच सकारात्मक असल्याचं मत चित्रपट व्यापार विश्लेषकांनी नोंदवलं आहे.

हेही वाचा:

The Kashmir Files: बजेट कमी, मोजकं प्रमोशन करूनही ‘द काश्मीर फाईल्स’ची दणक्यात कमाई

‘इंडियन आयडॉल 12’ फेम पवनदीप-अरुणिता कायद्याच्या कचाट्यात; वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

आधी ‘झुंड’वर ‘पावनखिंड’ भारी, आता ‘द काश्मीर फाईल्सनं’ दाबलं, IMDb रेटिंग्ज पाहिलात का?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.