AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कन्नड भाषेत बोलला नाही म्हणून अधिकाऱ्याने दिली अशी वागणूक; संतप्त कोरिओग्राफरने पोस्ट केला व्हिडीओ

सलमानला या घटनेची तक्रार करायची होती, परंतु ते कसं करावं याबद्दल कोणतीही मदत मिळालं नसल्याचं त्याने सांगितलं. यापुढे त्याने असंही म्हटलंय की त्याला 'बँगलोरीयन' असल्याचा अभिमान आहे, पण स्थानिक भाषा नीट माहित नसल्यामुळे अपमानित करणं योग्य नाही.

कन्नड भाषेत बोलला नाही म्हणून अधिकाऱ्याने दिली अशी वागणूक; संतप्त कोरिओग्राफरने पोस्ट केला व्हिडीओ
Salman Yusuff Khan Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 16, 2023 | 8:38 AM
Share

बेंगळुरू : प्रसिद्ध कोरिओग्राफर सलमान युसुफ खान याच्यासोबत बेंगळुरू एअरपोर्टवर धक्कादायक घटना घडली. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत त्याने या घटनेची माहिती दिली. बुधवारी तो दुबईला जाण्यासाठी बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता. त्यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला कन्नड भाषेत बोलण्यास सांगितलं. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीनंतर त्याने इनस्टाग्रामवर लाइव्ह येत घडलेली हकिकत सांगितली.

केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला टॅग करत त्याने लिहिलं, ‘मी दुबईला जाण्यासाठी निघालोय आणि इथे या इमिग्रेशन अधिकाऱ्याला भेटलो, ज्याने मला कन्नड भाषेत बोलण्यास सांगितलं. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की मी कन्नड भाषा समजू शकतो पण मी ती नीट बोलू शकत नाही. त्यावर तो अधिकारी माझ्याशी कन्नड भाषेतच बोलत राहिला. त्याने माझ्या पासपोर्टकडे बोट दाखवून त्यावरील माझं नाव, माझं जन्मस्थळ, माझ्या बाबांचं नाव आणि त्यांचं जन्मस्थळ यांकडे लक्ष वेधलं. तू आणि तुझे वडील बेंगळुरूमध्ये जन्माला आले आणि तरी तुम्हाला कन्नड बोलता येत नाही असं ते मला म्हणाले. त्यावर मी त्यांना म्हणालो की बेंगळुरूमध्ये जन्माला आल्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला भाषा आलीच पाहिजे.’

‘मी बेंगळुरूत जन्माला आलो असलो तरी जगभरात मी प्रवास करू शकलो. सौदीमध्ये मी लहानाचा मोठा झालो. त्यावर त्या अधिकाऱ्यांनी मला म्हटलं, जर तुम्हाला कन्नड बोलता येत नसेल तर मी तुमच्यावर संशय घेऊ शकतो’, असं त्याने पुढे लिहिलं. त्याचप्रमाणे शालेय शिक्षणादरम्यान देशात न राहिल्यामुळे कन्नड भाषा येत नसल्याचं सलमानने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं. फक्त मित्रांमुळे थोडीफार भाषा समजत असल्याचं तो म्हणाला.

पहा व्हिडीओ

सलमानने हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कोणत्याही गोष्टीसाठी संशयित मानलं जाऊ शकतं, असं संबंधित अधिकारी म्हणाला. सलमानने वारंवार त्या अधिकाऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही ते ऐकण्यास तयार होते. “तुमच्यासारखे अशिक्षित लोक जर या देशात राहत असतील तर हा देश कधीच मोठा होणार नाही, हे मी त्या अधिकाऱ्याला चिडून म्हणालो. त्यावरही त्यांनी मान खाली घालून बडबडण्यास सुरुवात केली”, असं सलमानने पुढे लिहिलं.

सलमानला या घटनेची तक्रार करायची होती, परंतु ते कसं करावं याबद्दल कोणतीही मदत मिळालं नसल्याचं त्याने सांगितलं. यापुढे त्याने असंही म्हटलंय की त्याला ‘बँगलोरीयन’ असल्याचा अभिमान आहे, पण स्थानिक भाषा नीट माहित नसल्यामुळे अपमानित करणं योग्य नाही.

2009 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमधून सलमान प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने बऱ्याच टीव्ही शोजमध्ये भाग घेतला. याशिवाय वाँटेड, एबीसीडी, स्ट्रीट ड्रान्सर थ्रीडी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिकाही साकारल्या आहेत.

नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?
नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?.
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान.
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ.
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे.
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!.
दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक
दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक.
ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं 'रोखठोक'
ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं 'रोखठोक'.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांचं विमान टेकऑफवेळी डगमगलं
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांचं विमान टेकऑफवेळी डगमगलं.
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.