Akshaye Khanna and Aishwarya Rai : ऐश्वर्या राय हिच्यासाठी अक्षय खन्नाची बोल्ड कमेंट… तुम्ही पागल लोकांसारखं तिला फक्त…

Akshaye Khanna and Aishwarya Rai : बॉलिवूडमध्ये कायम रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतात. सध्या अभिनेता अक्षय खन्ना याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा सुरु आहे. तर एकदा 'धरुंधर' फेम रेहमान डकैत याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यावर बोल्ड कमेंट केली होती...

Akshaye Khanna and Aishwarya Rai : ऐश्वर्या राय हिच्यासाठी अक्षय खन्नाची बोल्ड कमेंट... तुम्ही पागल लोकांसारखं तिला फक्त...
अभिनेता अक्षय खन्ना
| Updated on: Dec 17, 2025 | 12:21 PM

Akshaye Khanna and Aishwarya Rai : झगमगत्या विश्वास सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे कधीतरी तर, खसागी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. सेलिब्रिटींच्या आयुष्यातील काही जुने किस्से अनेक वर्षांनंतर देखील चर्चेत असतात. आता ‘धुरंधर’ फेम अभिनेता अक्षय खन्ना यांच्या खासगी आयुष्यातील चर्चांनी जोर धरला आहे… एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत अक्षय खन्ना याच्या खासगी आयुष्यातील चर्चांनी जोर धरला होता… एवढंच नाही तर, एका मुलाखतीत अभय याने ऐश्वर्या हिच्याबद्दल असणाऱ्या भावना देखील सर्वांसमोर व्यक्त केल्या होत्या…

सांगायचं झालं तर, अक्षय याने अनेक अभिनेत्रीसोबत लग्न केलं… पण अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत अक्षय याच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं… अशात अनेकांनी असं देखील समजून घेतलं की, याच कारणामुळे अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला… तर जाणून घेऊ काय होता को किस्सा…

90 च्या दशकात अक्षय खन्ना याने ऐश्वर्याची हिचं सर्वांसमोर कौतुक केलं होतं. ‘ताल’ सिनेमानंतर चाहत्यांनी ऐश्वर्या आणि अक्षय यांच्या जोडीला डोक्यावर घेतलं… दरम्यान करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अभिनेत्याने ऐश्वर्याचं मनभरुन कौतुक केलं होतं.

अक्षय म्हणालेला, ‘जेव्हा ती माझ्या समोर असते, तेव्हा माझ्या नजरा तिच्यावरून हटतच नाहीत… ही पुरुषांसाठी लाजिरवाणी गोष्ट असेल… पण ऐश्वर्या हिला आता सवय झाली असेल… तिला प्रत्येक जण एकटक पाहतच राहतो… पण कोणाकडे असं एकटक पाहायला आडत नाही… पण तुम्ही तिला पागल लोकांसारखं पाहत बसाल…’ असं देखील अक्षय म्हणालेला.

अभिनेता अक्षय खन्ना याचं लग्न

असं देखील सांगण्यात येतं की, अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यासोबत अक्षय याचं लग्न होणार होतं… दोघांच्या साखरपुड्यापर्यंत गोष्ट पोहोचली होची… पण करिश्माच्या आईचा नात्यासाठी नकार होता… मुलीने करीयरच्या उच्च शिखरावर लग्न करु नये… असं करिश्माच्या आईची इच्छा होती… अखेर करिश्मा आणि अक्षय यांचं लग्न होऊ शकलं नाही.

ऐश्वर्या राय हिचं लग्न

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने देखील अनेक अभिनेत्यांना डेट केलं. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत तिचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये ऐश्वर्या आण अभिषेक यांनी लग्न केलं.  त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला…