AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाखोंच्या पगाराची नोकरी नाकारली, एका शोने बदललं नशीब, बनला टीव्हीचा सुपरस्टार

टीव्ही इंडस्ट्रीमधील असा एक अभिनेता ज्याने लाखो रुपयांची नोकरी सोडली. 1 शोमुळे अभिनेत्याचं बदललं नशीब. आता बनला टीव्हीचा सर्वात महागडा सुपरस्टार.

लाखोंच्या पगाराची नोकरी नाकारली, एका शोने बदललं नशीब, बनला टीव्हीचा सुपरस्टार
| Updated on: Jun 29, 2026 | 3:55 PM
Share

सध्या सोशल मीडियापासून ते मनोरंजन विश्वापर्यंत अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आकांक्षाने एका राष्ट्रीय दूरचित्रवाणी कार्यक्रमात दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असल्याचे सांगत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की या निर्णयामागे कोणताही वाद, कटुता नाही आणि दोघांमध्ये आजही परस्पर आदर कायम आहे.

गौरव खन्ना हा अभ्यासामध्ये प्रचंड हुशार होता. कानपूरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये (एमबीए) पदव्युत्तर शिक्षण घेतले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या मोजक्या कलाकारांमध्ये त्याची गणना होते.

एमबीए पूर्ण होताच त्याला मुंबईतील एका प्रतिष्ठित कंपनीत मार्केटिंग आणि अॅडव्हर्टायझिंग विभागात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्याचे कॉर्पोरेट करिअर वेगाने पुढे जात होते. मात्र, नियतीने त्याच्यासाठी वेगळाच मार्ग निवडून ठेवला होता.

मॉडेलिंगमुळे उघडले अभिनयाचे दरवाजे

मुंबईत त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्समुळे त्याला जाहिराती आणि मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या. सुरुवातीला त्याने नोकरीसोबत छंद म्हणून मॉडेलिंग सुरू केले. मात्र, जाहिरातींमधील कामामुळे त्याला दूरचित्रवाणी मालिकांच्या ऑडिशन्सची संधी मिळू लागली आणि याच टप्प्यावर त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली.

‘ये प्यार न होगा कम’ने दिली मोठी ओळख

2009 मध्ये ‘ये प्यार न होगा कम’ या मालिकेतून गौरव खन्नाला मोठा ब्रेक मिळाला. या मालिकेत त्याच्या समोर अभिनेत्री यामी गौतम होती. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी भावली की गौरव खन्ना अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय झाला.

‘कुमकुम’मधील दमदार भूमिकेनंतर गौरवने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने ‘लव्ह ने मिला दी जोडी’, ‘उतरन’, ‘मेरी डोली तेरे आंगना’, ‘जीवन साथी’ आणि ‘ब्याह हमारी बहू का’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या. इतकेच नाही तर ‘चंद्रगुप्त मौर्य’ आणि ‘प्रेम या पहेली : चंद्रकांता’ यांसारख्या भव्य मालिकांमध्येही त्याने प्रमुख भूमिका निभावत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली.

रिअॅलिटी शोमध्येही ठसा

मालिकांबरोबरच गौरव खन्नाने विविध रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला. तो ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोचा भाग राहिला असून ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’चा विजेतेही ठरला. अभिनयासोबतच त्याच्या पाककलेलाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!