AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी फिजिकली सॅटिस्फाइड..; लग्न न करण्याच्या प्रश्नावर प्रसिद्ध सेलिब्रिटीचं रोखठोक उत्तर

प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर लग्न न करण्याबद्दल एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. आयुष्याचा आनंद फक्त लग्न केल्यानेच सिद्ध होत नाही, असं ती थेट म्हणाली. 52 वर्षीय गीता आजही सिंगल आहे.

मी फिजिकली सॅटिस्फाइड..; लग्न न करण्याच्या प्रश्नावर प्रसिद्ध सेलिब्रिटीचं रोखठोक उत्तर
Geeta KapurImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 16, 2026 | 5:58 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेता सलमान खान आणि कोरिओग्राफर गीता कपूर यांच्या लग्नाविषयी चाहत्यांकडून नेहमीच प्रश्न विचारले जातात. 52 वर्षीय गीता आजही सिंगल आहे. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळवल्यानंतरही गीताला अनेकदा, तू लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारला होता. तिच्याकडे नृत्याचं प्रशिक्षण घेणाऱ्या चाहत्यांनी तिला ‘गीता माँ’ असं नाव दिलं आहे. कोरिओग्राफीच्या विश्वात नाव कमावलेल्या गीताने एका मुलाखतीत इंटिमसी आणि शारीरिक संबंधाबाबत मोकळेपणे भाष्य केलं होतं. त्यावरून बराच वादसुद्धा झाला होता. “लग्न न केल्यामुळे मला माझ्या आयुष्यात कोणतीच कमतरता किंवा अपूर्ण असल्यासारखं वाटत नाही. आपल्या समाजात असं मानलं जातं की स्त्री विवाहित नसेल तर तिचं जीवन अपूर्ण आहे, परंतु मी या मताशी सहमत नाही”, असं ती म्हणाली होती.

या मुलाखतीत गीता कपूर पुढे म्हणाली, “लोक अनेकदा कोणतीच माहिती असल्याशिवाय इतरांच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी गृहित धरतात. लोकांना असं वाटतं की जर एखाद्याने लग्न केलं नसेल तर तो एकतर खूप धार्मिक आयुष्य जगत असेल किंवा पूर्णपणे एकटा असेल. मी कुमारी नाही किंवा ननसुद्धा नाही. मी सर्वसामान्य आयुष्य जगतेय. जर तुम्ही फिजिकली सॅटिस्फाइड राहण्याबाबत विचारत असाल तर, त्याला माझं उत्तर असेल हो. तुम्हाला काय वाटतं, मी नसेन का? यात वाईट काय आहे? मी शारीरिकदृष्ट्या समाधानी आहे.”

“स्वत:ला फिजिकली सॅटिस्फाय करणं चुकीचं नाही. हल्लीच्या काळात त्याला वेलनेस असं म्हणतात. याला वुमेन्स वेलनेस असंही म्हणतात. मी नन किंवा कुमारी नाही. मी माझे मोमेंट्स शोधू शकते. लोकांना भेटू शकते आणि एखाद्यासोबत इंटिमेटही होऊ शकते. जर एखादी महिला स्वत:कडे लक्ष देत असेल तर त्यात वाईट काय आहे”, असा थेट सवाल गीता कपूरने मुलाखत घेणाऱ्याला केला होता.

गीता कपूरने वयाच्या 15 व्या वर्षापासून प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानच्या टीमसोबत काम करण्यास सुरुवात केली होती. तिने फराहला ‘कुछ कुछ होता है’, ‘दिल तो पागल है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मोहब्बतें’ यांसारख्या चित्रपटांच्या कोरिओग्राफीमध्ये मदत केली आहे.

Follow Us
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?