AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घुसखोर पंडत’ सीरिजवरून तापलं राजकीय वातावरण; मायावतींची थेट केंद्राकडे ही मागणी

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'घुसखोर पंडत' या नव्या सीरिजवरून सध्या उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या वादात आता मायावती यांनी उडी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

'घुसखोर पंडत' सीरिजवरून तापलं राजकीय वातावरण; मायावतींची थेट केंद्राकडे ही मागणी
मनोज वाजपेयी, मायावतीImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2026 | 12:21 PM
Share

उत्तर प्रदेशच्या राजकारणात नेटफ्लिक्सवरील ‘घुसखोर पंडत’ या वेबसीरिजने चांगलीच खळबळ उडवली आहे. मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेल्या या वेब सीरिजमुळे तिथलं वातावरण तापलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशावरून या सीरिजचे दिग्दर्शक आणि टीमच्या विरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आता या सीरिजच्या वादात बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी उडी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणात त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला आहे. पंडितांना घुसखोर म्हणण्याबद्दल त्यांची तक्रार असून या सीरिजमध्ये देशातील ब्राह्मण समुदायाचा अपमान केल्याचा आरोप त्यांना केला आहे.

मायावती यांनी याप्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ‘गेल्या काही काळापासून फक्त उत्तर प्रदेशातच नाही तर चित्रपटांमध्येही पंडितांना घुसखोर म्हणत देशभरात त्यांचा अपमान आणि अनादर केला जात आहे. ही अत्यंत दु:खद आणि चिंतेची बाब आहे. यामुळे संपूर्ण ब्राह्मण समुदायात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. माझा पक्ष या सीरिजचा तीव्र निषेध करतो. केंद्र सरकारने तात्काळ यावर बंदी घालावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सीरिजच्या शीर्षकावरून वाद

‘घुसखोर पंडत’ या वेब सीरिजच्या शीर्षकावरून सुरू असलेला हा संपूर्ण वाद आता उत्तर प्रदेशातील राजकारणालाही प्रभावित करतोय. उत्तर प्रदेशात 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरणनिर्मिती करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसांत ब्राह्मणांच्या नाराजीचा मुद्दा जवळपास सर्वच विरोधी पक्षांकडून उचलून धरण्यात आला होता. ब्राह्मण समुदायाच्या दुर्लक्षाचा मुद्दा समाजवादी पार्टीपासून बहुजन समाज पार्टीपर्यंत सर्वांनी उपस्थित केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र ब्राह्मण समाज हा भाजपच्या बाजूने एकजूट दिसला होता. काही दिवसांपूर्वीच विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ब्राह्मण आमदारांची एक बैठकसुद्धा झाली. यावरून भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने प्रश्न उपस्थित केला होता. प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी हे ब्राह्मण आमदारांना इशारा देताना दिसले. त्यानंतरच मायावती यांनी या मुद्द्यावर एक निवेदन जारी करून अशा बैठकांचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला.

2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी ब्राह्मण समाजाच्या मतपेढीला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मागासवर्गीय, दलित आणि मुस्लीम मतपेढींसह ब्राह्मणांनाही एकत्र करून राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर आता मायावती पुन्हा एकदा ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Follow Us
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.