AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रेयस तळपदेची Untold स्टोरी, सर्वांपासून लपवलं लग्न, कॉलेज सेक्रटरीसोबत अभिनेत्याची हटके लव्हस्टोरी

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेचं कॉलेज सेक्रटरीवर जडला जीव, 'या' कारणामुळे सर्वांपासून लपवलं लग्न... तुम्हाला माहितेय अभिनेत्याची Untold स्टोरी... सर्वत्र फक्त आणि फक्त श्रेयस याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

श्रेयस तळपदेची Untold स्टोरी, सर्वांपासून लपवलं लग्न, कॉलेज सेक्रटरीसोबत अभिनेत्याची हटके लव्हस्टोरी
| Updated on: Jan 27, 2024 | 12:05 PM
Share

मुंबई | 27 जानेवारी 2024 : अभिनेता श्रेयस तळपदे याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयस याची प्रकृती गंभीर होती. पण आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. प्राण बचावल्यानंतर माझा हा दुसरा जन्म आहे… असं खुद्द श्रेयस म्हणाला होता. आज श्रेयस याचा वाढदिवस असल्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला आहे. सांगायचं झालं तर, श्रेयस कायम त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण अभिनेत्याने कधीच स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य केलं नाही. पण श्रेयस याची लव्हस्टोरी फार भन्नाट आहे.

श्रेयस आणि दिप्ती यांची पहिली भेट दिप्ती हिच्या कॉलेजमध्ये झाली होती. तेव्हा कॅलेजच्या सेक्रेटरीला म्हणजे दिप्तीला पाहून, पहिल्या नजरेतच श्रेयस दिप्तीच्या प्रेमात पडला. ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण श्रेयस याला दिप्तीसोबत झालेलं लग्न लपवावं लागलं.

श्रेयस याचा ‘इकबाल’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या सहा महिन्यांपूर्वी श्रेयस याने दिप्ती हिच्यासोबत लग्न केलं. पण श्रेयस याला लग्न सर्वांपासून लपवावं लागलं. श्रेयस याने लग्न केलं म्हणून सिनेमाचे दिग्दर्शक नागेश कुकुनूर नाराज होते.

श्रेयस याचं लग्न झालं आहे.. ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचली, तर त्याचा परिणाम सिनेमावर होईल याची भीती दिग्दर्शकांना होती. म्हणून नागेश यांनी अभिनेत्याला लग्न रद्द कर म्हणून सांगितलं. पण मध्यम वर्गीय घरातील लग्न होतं. लग्नाच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या. म्हणून लग्न रद्द करणं शक्य नव्हतं. एवढंच नाही तर, लग्नासाठी श्रेयस याला सुट्ट्या देखील मिळणार नव्हत्या.

अशात दिग्दर्शकांनी विचार केला की, श्रेयस सिनेमात डेब्यू करत आहे आणि अशात लग्न केल्यास सिनेमावर आणि श्रेयसच्या करियरवर वाईट परिणाम होतील. पण श्रेयसने दिग्दर्शकांना सांगितलं की, मी लग्नाबद्दल कोणालाही सांगणार नाही. तेव्हा लग्नासाठी अभिनेत्याला एका दिवसाची सुट्टी मिळाली आणि श्रेयस आणि दिप्तीचं लग्न झालं.

श्रेयसने लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. लग्नाच्या 14 वर्षांनंतर 4 मे 2018 साली श्रेयस आणि दिप्ती सरोगेसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. श्रेयस कायम पत्नी आणि लेकीसोबत फोटो पोस्ट करत असते. श्रेयस सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण