AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai | परदेशात भारतीयांना अशिक्षित समजलं जातं का? ऐश्वर्या रायने सांगितला किस्सा

2012 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती की तिने 'मिस वर्ल्ड' या सौंदर्यस्पर्धेतील मोठ्या यशाचा विचार केवळ करिअरमधील एक पाऊल म्हणून नाही तर आपल्या देशासाठी कल्चरल ॲम्बेसेडर बनण्याच्या माध्यमातून विचार केला होता.

Aishwarya Rai | परदेशात भारतीयांना अशिक्षित समजलं जातं का? ऐश्वर्या रायने सांगितला किस्सा
Aishwarya RaiImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 16, 2023 | 2:50 PM
Share

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या अभिनय आणि सौंदर्यासोबतच विचारांसाठीही ओळखली जाते. डेव्हिड लेटरमॅनच्या एका टॉक शोमध्ये तिने दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा झाली होती. या शोमध्ये तिला विचारण्यात आलं होतं की भारतात मुलांनी त्यांच्या आईवडिलांसोबत राहणं सर्वसामान्य आहे का? त्यावर ऐश्वर्याने दिलेल्या उत्तराने सर्व भारतीयांची मनं जिंकली होती. तिने म्हटलं होतं की, “आम्ही भारतीय आमच्या आईवडिलांना भेटण्यासाठी अपॉईंटमेंट घेत नाही.” तर एका दुसऱ्या मुलाखतीत ऐश्वर्याने भारत आणि भारतीयांविषयी असलेल्या अशा गैरसमजुतींबद्दल वक्तव्य केलं, ज्यांचा सामना अनेकदा परदेशात करावा लागतो.

ऐश्वर्याने सांगितलं की लोक तिला असे-असे प्रश्न विचारायचे, ज्यामुळे ती थक्क व्हायची. 2012 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती की तिने ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्यस्पर्धेतील मोठ्या यशाचा विचार केवळ करिअरमधील एक पाऊल म्हणून नाही तर आपल्या देशासाठी कल्चरल ॲम्बेसेडर बनण्याच्या माध्यमातून विचार केला होता.

ती म्हणाली, “मला हे जाणून खूप आश्चर्य वाटलं की जगातील बऱ्याच भागात वर्तमानकाळातील भारताबद्दल किती गैरसमजुती आहेत आणि मी स्वत:ला फार नशीबवान मानते की त्या गैरसमजुती दूर करण्याची संधी मला मिळाली. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जेव्हा सुरुवातीला मी जरा आरामात इंग्रजी बोलायची, तेव्हा ते मला विचारायचे ‘तू भारतात शिकलीस का? तू खरंच चांगली इंग्रजी बोलतेस.’ तेव्हा मी त्यांना सांगायचे की, ठीक आहे, आम्ही भारतात सुद्धा इंग्रजी शिकतो.”

‘द लेट शो विथ डेव्हिड लेटरमॅन’मध्ये ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यात आला होता, “तू तुझ्या आई-वडिलांसोबत राहतेस का? हे खरंय का? भारतात मुलांनी त्यांच्या पालकांसोबत राहणं सर्वसामान्य आहे का?” त्यावर उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली, “आपल्या आईवडिलांसोबत राहणं ठीक आहे. कारण भारतात ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आम्हाला आमच्या आई-वडिलांसोबत मिळून जेवण जेवण्यासाठी वेगळी अपॉईंटमेंट घ्यावी लागत नाही.” हे ऐकताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ऐश्वर्याचं उत्तर ऐकल्यानंतर लेटरमॅन म्हणाला, “मला असं वाटतंय की आज रात्री आपण इथून काहीतरी शिकून जातोय.”

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.