AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिमांना 4 बायका ठेवण्याचा हक्क, हिंदू मात्र…, जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य

Javed Akhtar | जावेद अख्त कायम त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांचे हक्क आणि अधिकारांवर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जावेद अख्तर यांची चर्चा रंगली आहे. तर जावेद अख्तर यांनी असं वक्तव्य का केलं जाणून घेऊ.

मुस्लिमांना 4 बायका ठेवण्याचा हक्क, हिंदू मात्र..., जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Mar 19, 2024 | 8:39 AM
Share

मुंबई | 19 मार्च 2024 : बॉलिवूडचे दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर कायम त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. जावेद अख्तर म्हणाले समान नागरी कायद्याला (Uniform Civil Code) माझा पाठिंबा आहे. शिवाय खऱ्या आयुष्यात कायद्याचं पालन देखील करतो.. असं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं. पण मुस्लिमांचा द्वेष करणाऱ्या लोकांचा पाठिंबा UCC ला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी समाजात सुरु असणाऱ्या आणि स्वतःला खटकणाऱ्या गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जावेद अख्तर यांची चर्चा रंगली आहे.

Uniform Civil Code वर स्वतःचं मत मांडत जावेद अख्तर म्हणाले, ‘फक्त मुस्लिमांवर टीका करण्यासाठी काही नियम लागू करणं योग्य नाही. चर्चा करुन काही नियम समान रुपाने सर्वांसाठी लागू करण्यात यायला हवेत. मी स्वतःसमान नागरी कायद्याचं पालन करतो. पण मुस्लिमांना बहुविवाह करता येऊ नये म्हणून समान नागरी कायद्याला पाठिंबा देत असेल तर हे चुकीचं आहे…’ असं देखील जावेद अख्तर म्हणाले.

पुढे जावेद अख्तर विनोदी अंदाजात म्हणाले, ‘मुस्लिमांना चार बायका ठेवण्याचा अधिकार आहे म्हणून इतर लोकं जळतात. कायदा लागू करण्यासाठी हेच एक कारण आहे का? जर तुम्हाला देखील हा हक्क दिला गेल्यास काही अडचणी येणार नाहीत…’ हिंदू व्यक्ती आणि त्यांच्या लग्नांवर देखील जावेद अख्तर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

‘बेकायदेशीर रित्या हिंदू देखील बहुविवाह करत आहेत. हिंदूंमध्ये दोन लग्न अधिक आहे… सांगितलं जातं. प्रत्येकासाठी कायदा सारखा असायला हवा. मी माझ्या मुलाला आणि मुलीला समान अधिकार दिले आहेत.’ असं देखील जावेद अख्तर म्हणाले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जावेद अख्तर यांची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, जावेद अख्तर कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही बेधडक वक्तव्यांमुळे त्यांनी वादग्रस्त परिस्थितीचा देखील समना करावा लागला आहे. एवढंच नाहीतर, जावेद अख्तर त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.