AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहताच्या शुटिंगदरम्यान राडा, जेठालाल यांनी कोणाची कॉलर पकडली?

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका अनेकदा वादात सापडली आहे. शोचे निर्माते असित मोदी आणि स्टार कास्ट यांच्यात वारंवार वाद होत आहेत. आता अपडेट समोर आले आहे की, शोच्या निर्मात्याचे जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीशी भांडण झाले आहे.

तारक मेहताच्या शुटिंगदरम्यान राडा, जेठालाल यांनी कोणाची कॉलर पकडली?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 18, 2024 | 6:55 PM
Share

टेलिव्हिजनच्या जगातील प्रेक्षकांचा सर्वात आवडता शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या नकारात्मक कारणांमुळे चर्चेत आहे. या शोची कथा सध्या कलाकार आणि निर्मात्यांच्या भांडणामुळे चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये जेठालाल चंपकलाल गडा यांची भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याची बातमी समोर आली आहे.

दोघांमध्ये भांडण हे फी किंवा पैशावरून नसून रजेवरून असल्याचे बोलले जात आहे. रजेबाबत दोघांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे वृत्त आहे. शोच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल यांनी असित मोदी यांना शोमधून काही दिवसांची रजा मागितली होती, परंतु निर्मात्याने त्यावर काहीही उत्तर दिले नाही. या प्रकाराने जेठालाल चांगलाच संतापले. त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.

एका सूत्राने वेबसाइटला सांगितले की, तो दिवस कुश शाहच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. इथे दिलीप जोशी निर्मात्यांची येण्याची वाट पाहत होते आणि त्यांच्या सुट्ट्यांबद्दल त्यांच्याशी बोलले, पण ते आले आणि थेट कुशला भेटायला गेले. यावरून दिलीप जोशी संतापले. आणि त्यांच्यात जोरदार वादावादी झाली.

एवढेच नाही तर भांडण इतके वाढले की दिलीप जोशी यांनी त्यांची कॉलर पकडून शो सोडण्याची धमकीही दिल्याचे बोलले जात आहे. याआधीही दोघांमध्ये अशीच परिस्थिती झाल्याचे बोलले जात आहे. या शोच्या हाँगकाँगच्या ट्रीपच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये खूप भांडण झाले होते, पण त्यादरम्यान गुरचरण सिंग सोधीने दोघांची समजूत घातली आणि दोघांना शांत केले.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या 16 वर्षांपासून यशस्वीपणे लोकांच्या मनात स्थान राखून आहे. दिलीप जोशी पहिल्या दिवसापासून या शोचा भाग आहेत. दिशा वकानी, राज अनाडकट, भव्य गांधी, गुरुचरण सिंह आणि जेनिफर मिस्त्री यांच्यासह शोमधील अनेक महत्त्वाच्या सदस्यांनी शो सोडला आहे.

Follow Us
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प