AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Srivastava: ‘पहिल्यांदाच रडवलंस भावा’; कपिल शर्माची भावूक पोस्ट

राजू श्रीवास्तव यांच्याबाबतची कपिल शर्माची 'ती' इच्छा अपूर्णच!

Raju Srivastava: 'पहिल्यांदाच रडवलंस भावा'; कपिल शर्माची भावूक पोस्ट
राजू श्रीवास्तव, कपिल शर्माImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 21, 2022 | 7:37 PM
Share

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. राजू यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांसोबतच चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा शोकाकुल झाले आहेत. राजू यांच्याप्रमाणेच कपिल शर्मालाही (Kapil Sharma) कॉमेडीचा बादशाह मानला जातं. राजू यांच्या निधनानंतर कपिल शर्मानेही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत कपिलने एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. या फोटोमध्ये कपिल आणि राजू हसताना दिसत आहेत.

‘आज पहिल्यांदाच तू मला रडवलंस, राजू भाई. आपली अजून एक भेट व्हायला पाहिजे होती. देव तुला त्याच्या चरणी स्थान देवो. तुझी खूप आठवण येईल. अलविदा, ओम शांती,’ अशा शब्दांत कपिलने भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिलप्रमाणेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी, हिंमाशी खुराना, आमिर खान, रवी किशन, अली असगर, विवेक अग्निहोत्री यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं.

राजू यांना 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांनी जवळपास 40 दिवस मृत्यूशी झुंज दिली.

रुग्णालयात दाखल केल्यापासून राजू यांना शुद्धच आली नव्हती. ते सतत व्हेंटिलेटरवर होते. फक्त एक-दोनदा त्यांच्या शरीराची हलकी हालचाल झाली. मधल्या काळात त्यांच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा झाली होती. पण गेल्या पाच दिवसांपासून त्यांना खूप ताप आणि शरीरात संसर्गही झाला होता. संसर्गामुळे कुटुंबातील एकाही सदस्याला त्यांची भेट घेण्याची परवानगी नव्हती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.