AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एकेदिवशी त्यांना सगळं समजेल तेव्हा..”; करण जोहरने मुलांविषयी व्यक्त केली भीती

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा पिता बनला. आमची आई कोण आहे, असा प्रश्न सतत मुलांकडून विचारला जात असल्याचं करणने याआधी म्हटलं होतं. मुलांच्या या कठीण प्रश्नांना सामोरं जाण्याची भीती त्याने व्यक्त केली.

एकेदिवशी त्यांना सगळं समजेल तेव्हा..; करण जोहरने मुलांविषयी व्यक्त केली भीती
Karan Johar with kidsImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 03, 2024 | 3:34 PM
Share

‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’च्या नव्या सिझनमध्ये सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले. एका एपिसोडमध्ये अभिनेत्री नीलम कोठारी तिच्या पहिल्या लग्नाविषयी पहिल्यांदाच व्यक्त झाली. तर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसुद्धा यावेळी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. आता नेटफ्लिक्सच्या मुलाखतीत करणने त्याच्या मुलांकडून विचारल्या जाणाऱ्या कठीण प्रश्नांविषयी सतत मनात भीती वाटत असल्याचा खुलासा केला आहे. 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून करण दोन मुलांचा पिता बनला. यश आणि रुही अशी त्याच्या मुलांची नावं आहेत.

नीलम कोठारीच्या पहिल्या घटस्फोटाविषयी बोलताना करण म्हणाला, “मी तुझ्या (नीलम) आयुष्यातील त्या कठीण टप्प्याचा एक भाग आहे. मला ते दिवस अजूनही स्पष्ट आठवतात. माझे डोळे पाणावलो होते. तू तुझ्या मुलीविषयी बोललीस आणि ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली होती. मला सतत ही भीती वाटते की माझ्या मुलांकडूनही त्या प्रश्नांचा भडीमार होणार आणि मला त्यांची उत्तरं द्यायची आहेत. माझी परिस्थिती कशी आहे आणि आमच्या मॉडर्न फॅमिलीविषयी त्यांना समजावून सांगावं लागणार आहे. कधी ना कधी त्यांना गोष्टी समजतील आणि त्यांना उत्तरं मलाच द्यावी लागणार आहेत. एकल पालक म्हणून मीच माझ्या मुलांना उत्तर देण्यासाठी बांधिल आहे. मला त्याच्या बऱ्याच गोष्टी समजावून सांगाव्या लागतील.”

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या एपिसोडमध्ये नीलम कोठारी म्हणाली, “मी कामावरून आले आणि अहाना तिच्या मैत्रिणींसोबत होती. नेहमी ते सतत इथेतिथे धावत, उड्या मारत, ओरडत खेळत असतात. पण त्यादिवशी घरात सगळेच शांत होते. अहाना माझ्याजवळ आली आणि म्हणाली की, आई तू मला कधीच सांगितलं नाहीस की तुझा घटस्फोट झाला आहे. तो प्रश्न ऐकून माझं विश्वच संपुष्टात आलं होतं. माझ्याकडे काहीच शब्द नव्हते. मी अहानाला विचारलं की तुला हे कोणी सांगितलं? त्यावर ती म्हणाली, तू सेलिब्रिटी आहेस, त्यामुळे माझे मित्रमैत्रिणी तुझ्याविषयी गुगलवर सर्च करत होते. त्यांना पहिली गोष्ट हीच दिसली की तुझा घटस्फोट झाला आहे. तुझं लग्न झालं होतं.”

नीलम कोठारीने 2011 मध्ये अभिनेता समीर सोनीशी दुसरं लग्न केलं. 2013 मध्ये त्यांनी अहानाला दत्तक घेतलं होतं. तर दुसरीकडे करण जोहरला सरोगसीच्या माध्यमातून जुळी मुलं झाली. याआधीही विविध मुलाखतींमध्ये करण त्याच्या मुलांच्या संगोपनाविषयी, एकल पालकत्वाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. आई हिरू यांच्यासोबत मिळून करण त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतोय. त्याची मुलं त्याला त्यांच्या आईविषयी आणि जन्माविषयी प्रश्न विचारू लागले आहेत, असंही त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मुलांच्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्याला आवश्यक ते मार्गदर्शन घ्यावं लागलं, असंही तो म्हणाला होता.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...