AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या मुलीला सर्व सहन करावं लागू नये..; असं का म्हणाली करिश्मा कपूर?

करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं होतं. करिश्माला तिच्या वैवाहिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. याविषयी ती एका मुलाखतीत व्यक्त झाली होती. माझ्या मुलीला हे सर्व सहन करावं लागू नये, असं ती म्हणाली होती.

माझ्या मुलीला सर्व सहन करावं लागू नये..; असं का म्हणाली करिश्मा कपूर?
Karisma Kapoor and Sunjay KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2025 | 8:55 AM
Share

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. पोलो खेळताना चुकून मधमाशी गिळल्याने त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली आणि त्यामुळेच त्याला हृदयविकाराचा झटका आला, असं म्हटलं गेलं. संजय आणि करिश्माचं वैवाहिक आयुष्य अनेक कारणांमुळे चर्चेत आलं होतं. घटस्फोटादरम्यान करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबीयांवर बरेच आरोप केले होते. तर संजयने 2005 मध्ये करिश्माविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. तेव्हापासूनच दोघांचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलं होतं. या याचिकेत करिश्माला मुलगी समायराला संजयच्या माहितीशिवाय देशाबाहेर घेऊन जाण्यास नकार देण्यात आला होता. संजयने करिश्मावर आरोप केला होता की समायराच्या नावावर पासपोर्ट जारी करताना सर्व कायदेशीर बाबींचं उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यावरून कोर्टाने RPO ला नोटीस बजावली होती. तेव्हा करिश्माने पहिल्यांदाच तिच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांबद्दल व्यक्त झाली होती.

“या मुद्द्यावर मी पहिल्यांदाच बोलतेय. मी सध्या फार काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. माझी मुलगी समायरा फक्त चार महिन्यांची आहे आणि तिच्यासाठी माझ्या मनात खूप भीती आहे. अर्थातच समायरा कोणत्या गोष्टी समजू शकत नाही. या सगळ्या गोष्टींनी मी प्रभावित होऊ नये याचा पूर्ण प्रयत्न करतेय. माझ्यासाठी ही खूप कठीण वेळ आहे. मला माझा वेळ हवा आहे. मी माझ्या मुलीबद्दलही खूप सजग आहे की तिच्यावर या गोष्टींचा परिणाम होऊ नये. जेव्हा ती मोठी होईल, तेव्हा मला विश्वास आहे की देव तिची काळजी घेईल”, असं करिश्मा म्हणाली होती.

करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट 2016 मध्ये झाला होता. त्यावेळी पोटगी म्हणून करिश्माला 70 कोटी रुपये आणि सासऱ्यांचं वडिलोपार्जित घर मिळालं होतं, असं म्हटलं जातं. तर संजयने मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांच्यासाठी 14 कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले होते. संजयचं 12 जून 2025 रोजी निधन झालं. नवी दिल्लीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी करिश्मा तिच्या दोन्ही मुलांना घेऊन अंत्यविधीला पोहोचली होती.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.