AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नागरिक मुंबई बाहेर जातील, अतिक्रमण शहर व्यापेल अन् मग…”, सुमित राघवन संतापला

अभिनेता सुमित राघवन समाजात घडणाऱ्या अनेक बाबींवर आपली मतं मांडत असतो. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न तो मांडत असतो. आताही त्याने अश्याच एका नागरी समस्येवर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अतिक्रमण हा वाढत्या शहरीकरणातील गंभीर प्रश्न आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी अतिक्रमणाची समस्या वाढताना दिसतेय. यावरच सुमित राघवन बोलता झाला आहे.

नागरिक मुंबई बाहेर जातील, अतिक्रमण शहर व्यापेल अन् मग..., सुमित राघवन संतापला
सुमित राघवन
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Mar 01, 2022 | 12:11 PM
Share

मुंबई : अभिनेता सुमित राघवन (Sumit Raghawan) समाजात घडणाऱ्या अनेक बाबींवर आपली मतं मांडत असतो. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न तो मांडत असतो. आताही त्याने अश्याच एका नागरी समस्येवर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अतिक्रमण (Encroachment) हा वाढत्या शहरीकरणातील गंभीर प्रश्न आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी अतिक्रमणाची समस्या वाढताना दिसतेय. यावरच सुमित राघवन बोलता झाला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. “मेट्रो कारशेड स्थलांतरित केलं. पण दहिसर टोल नाका आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरचं बेकायदेशीर अतिक्रमण याकडे कुणाचं लक्ष नाही. ते हटवण्यासाठी काहीही केलं जात नाही. अश्याने मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील, अतिक्रमण वाढत जाईल. आणि तुम्हीही या अतिक्रमणग्रस्त शहरात शांततापूर्ण जीवन जगू शकाल”, असं सुमित आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.

सुमित राघवनचं ट्विट

सुमित राघवन याने एक ट्विव करत अतिक्रमणावर भाष्य केलं आहे. “मेट्रो कारशेड स्थलांतरित केलं. पण दहिसर टोल नाका आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरचं बेकायदेशीर अतिक्रमण याकडे कुणाचं लक्ष नाही. ते हटवण्यासाठी काहीही केलं जात नाही. अश्याने मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील, अतिक्रमण वाढत जाईल. आणि तुम्हीही या अतिक्रमणग्रस्त शहरात शांततापूर्ण जीवन जगू शकाल”, असं सुमित आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

व्हीडिओतून भाष्य

सुमितने आपल्या व्हीडिओच्या माध्यमातून अतिक्रमणावर आपलं मत मांडलं आहे. “तीन दिवसापूर्वी ही दुकानं हटवण्यात आली होती. पुन्हा ही दुकानं त्याच ठिकाणी दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला असं अतिक्रमण करत दुकानं थाटली जातात, त्याला परवानगी कशी मिळते?, हे मला जाणून घ्यायचं आहे. मी मुंबई महापालिकेला विनंती करतो की त्यांनी अतिक्रमणाच्या समस्येकडे लक्ष द्यावं आणि त्वरित हा प्रश्न सोडवावा”, असं म्हणत सुमित राघवनने संताप व्यक्त केला.

सुमित राघवनने नागरिकांशी संबंधित प्रश्न मांडला आहे. यावर आता मुंबई महापालिका लक्ष देणार का आणि हा प्रश्न सुटणार का?, हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या

‘लोक मला ‘कालिया’ म्हणायचे’; रेमो डिसूझाने सांगितला वर्णभेदाचा कटू अनुभव

‘आई कुठे काय करते’च्या सासू-सुनेचा धमाकेदार परफॉर्मन्स; अरुंधती-अनघाची जोरदार तयारी

कोण आहे ‘ती’ खास व्यक्ती? नेहा पेंडसेच्या प्रश्नावर संस्कृतीचा इशारा

Follow Us
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.