AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषी कपूर यांच्या आठवणीने नीतू कपूर झाल्या भावूक, म्हणाल्या ‘तुमच्याशिवाय आयुष्य आता…’

ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर आणि मुलगी रिद्धिमा अनेकदा त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करतात. आज नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

ऋषी कपूर यांच्या आठवणीने नीतू कपूर झाल्या भावूक, म्हणाल्या ‘तुमच्याशिवाय आयुष्य आता...’
ऋषी आणि नीतू कपूर
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Apr 30, 2021 | 3:58 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) गेल्या वर्षी 30 एप्रिलला या जगाचा निरोप घेऊन दूर निघून गेले. ऋषी कपूर यांच्या अशा अचानक जाण्याच्या धक्क्यामुळे त्यांचे कुटुंब आणि चाहते अद्याप दुःखातून सावरलेले नाहीत. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर आणि मुलगी रिद्धिमा अनेकदा त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करतात. आज नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावनिक पोस्ट शेअर केली आहे (Neetu Kapoor Share Emotional post remembering rishi kapoor).

नीतू कपूर यांनी पती ऋषीसोबत एक जुना फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘मागील वर्ष जगासाठी दुःख आणि कष्टप्रद होते. आमच्यासाठी ते थोडे अधिक होते कारण आम्ही तुम्हाला गमावलं. असा एकही दिवस गेलेला नाही ज्यात आम्ही तुमच्याबद्दल बोललो नाही किंवा तुमची आठवण काढली नाही. कधी तुमचा सल्ला तर कधी तुमचा विनोद. चेहऱ्यावर हास्य घेऊन आम्ही वर्षभर राहिलो आहोत. ते नेहमी आमच्या मनात राहतील आणि आम्ही हे मान्य केले आहे की, आता त्यांच्याशिवाय आयुष्य असेच राहणार आहे, परंतु आयुष्य पुढे जाणारच आहे’.

नीतू कपूर यांची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आली आहे. यावर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. आलिया भट्टची आई सोनी राझदान यांनी देखील त्यांच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. त्या म्हणाल्या, ‘आम्ही सर्वजण त्याची आठवण काढतो’. त्याचवेळी ऋषी कपूरची मुलगी रिद्धिमाने पोस्टवर हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

पाहा पोस्ट

 (Neetu Kapoor Share Emotional post remembering rishi kapoor)

कर्करोगाशी सुरु होती झुंज

ऋषी कपूर यांना ल्युकेमिया होता. हा पांढऱ्या रक्त पेशींचा कर्करोगाचा एक प्रकार आहे. यावर उपचार घेण्यासाठी ऋषी कपूर अनेक वेळा अमेरिकेत गेले. 2018मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर 11 महिने उपचारही झाले. सप्टेंबरमध्ये ऋषी कपूर अमेरिकेतून परत आले. कुटुंबासमवेत बराच वेळ घालवला.

30 एप्रिल 2020ला घेतला जगाचा निरोप

28 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी ऋषी कपूरची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांना सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जेथे तातडीने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्याचवेळी त्यांचे रूग्णालयातील काही व्हिडीओही समोर आले होते. परंतु 30 एप्रिल रोजी सकाळी 8 : 45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(Neetu Kapoor Share Emotional post remembering rishi kapoor)

हेही वाचा :

ऋषी-राजीवच्या निधनानंतर एकटे पडले रणधीर कपूर, वडिलोपार्जित घर विकण्याचा घेतला निर्णय!

Death Anniversary | माध्यमांपासून लपवले होते कर्करोग झाल्याचे वृत्त, ऋषी कपूर यांच्या उपचारांच्या खर्चावर उडाल्या होत्या अफवा!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली