AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्याविरुद्ध 500 केसेस झाल्या.. News9 Global Summit च्या मंचावर एकता कपूर स्पष्टच बोलली

न्यूज9 ग्लोबल समिटच्या मंचावर प्रसिद्ध प्रोड्यूसर एकता कपूरने हजेरी लावली. एखाद्या कंटेंटचा लोकांवर काय परिणाम होतो, यावर तिने परखडपणे मत मांडलं. अश्लील शो बनवण्याच्या आरोपांवर तिचं काय म्हणणं आहे, चला जाणून घेऊया.

माझ्याविरुद्ध 500 केसेस झाल्या.. News9 Global Summit च्या मंचावर एकता कपूर स्पष्टच बोलली
एकता कपूरImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 20, 2025 | 12:22 PM
Share

19 जून रोजी दुबईमध्ये टीव्ही9 नेटवर्कच्या न्यूज9 ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध प्रोड्यूसर आणि बालाजी टेलिफिल्म्सची सर्वेसर्वा एकता कपूर उपस्थित होती. अनेक विषयांवर संवाद साधतानाच एकताने अश्लील शो बनवण्याच्या आरोपांवरही उत्तर दिलं. खरंतर, तिला ऑल्ट बालाजीबाबत अनेक वादांना तोंड द्यावे लागले. माझ्या विरुद्ध 500 खटले दाखल आहेत असं एकता कपूरने स्पष्टपणे सांगितलं.

तुम्ही कंटेट तयार करता, पण तो तयार करताना तुम्हाला कधी अडचणी आल्या आहेत का ? कारण त्या कंटेंटचा काय परिणाम होईल याचा एक जबाबदार नागरिक नेहमीच विचार करतो, असा प्रश्न टीव्ही9चे एमडी आणि सीईओ बरण दास यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना एकता कपूर म्हणाली, ” हो नक्कीच, ती दुविधा, अडचण तर नेहमीच सोबत असते. ”

काय म्हणाली एकता कपूर ?

एकता पुढे म्हणाली, “ माझा विवेक, माझा अंतरात्मा मला जो कंटेट बनवण्याची परवानगी देत नाही, असा कंटेट मी बनवतच नाही. बालाजीने कौटुंबिक कंटेंट बनवला आणि त्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हटले गेले. Alt ने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कंटेंट बनवला, पण त्यामुळे समाजाचे खूप नुकसान होत आहे असं म्हणण्यात आलं. पण हे खूप कमी लोकांना माहीत असेल की मी जेव्हा Alt चालवत होते तेव्हा माझ्यावर 500 पेक्षा जास्त केसेस दाखल झाल्या होत्या. खरंतरं मी ते (Alt) अगदीच कमी काळासाठी चालवलं होतं.”

एकता कपूर बऱ्याच काळापासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. ती छोट्या पडद्यावरची सर्वात यशस्वी निर्माती आहे. तिने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली आणि वयाच्या 19 व्या वर्षी तिने एक उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. माझ्या वडीलांना ( अभिनेता जितेंद्र) माझ्यावर खूप विश्वास होता, त्याच विश्वासामुळे मला प्रेरणा मिळाली आणि म्हणूनच आज मी या स्थानी आहे, असं एकत कपूरने नमूद केलं.

पहिला शो कोणता होता ?

1995 साली आलेला ‘हम पांच’ हा एकता कपूरचा पहिला टीव्ही शो होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही आणि एकामागून एक शो करत राहिली. एकताबद्दल असेही म्हटले जाते की ती एक अशी निर्माती आहे जिने सर्वाधिक कलाकारांना लाँच केले आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत