AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांना स्पष्टीकरण देण्यासाठी माझा जन्म..; वर्षा उसगांवकरांसोबतच्या भांडणांबद्दल काय म्हणाली निक्की?

बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळीचं सतत वर्षा उसगांवकर यांच्याशी भांडणं व्हायची. या भांडणांबद्दल ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. मला वर्षाताईंबद्दल माहीत नव्हतं, अशीही कबुली निक्कीने दिली.

लोकांना स्पष्टीकरण देण्यासाठी माझा जन्म..; वर्षा उसगांवकरांसोबतच्या भांडणांबद्दल काय म्हणाली निक्की?
निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकरImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2024 | 10:15 AM
Share

अभिनेत्री निक्की तांबोळीने ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सिझन चांगलंच गाजवलं. या सिझनमध्ये ती टॉप 5 स्पर्धकांपर्यंत पोहोचली होती. मात्र बिग बॉसची ट्रॉफी पटकावण्यापासून ती हुकली. हा सिझन संपल्यानंतर निक्की विविध मुलाखतींमध्ये बिग बॉसच्या घरातील तिच्या प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त होत आहे. बिग बॉसच्या घरात निक्की दोन कारणांमुळे विशेष चर्चेत राहिली. यापैकी पहिलं कारण म्हणजे तिची आणि अरबाज पटेलची जवळीक आणि दुसरं कारण म्हणजे वर्षा उसगांवकर यांच्याशी तिची झालेली भांडणं. या मुलाखतीत निक्कीने वर्षा यांच्यासोबत झालेल्या भांडणांविषयी खंत बोलून दाखवली.

“मी बिग बॉसच्या घरात वर्षाताईंसोबत उद्धटपणे बोलले, याची मला खंत वाटते. पण तिथे मी त्यांची माफीसुद्धा मागितली आणि त्यांनी मला माफसुद्धा केलं होतं. बिग बॉसची ट्रॉफी कोणीची उचलली तरी मला तो शो गाजवायचा होता आणि मी तेच केलं”, असं निक्की म्हणाली. तू वर्षा उसगांवकरांबद्दल कधीच ऐकलं नव्हतंस का, असा प्रश्न निक्कीला पुढे विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “मी खरंच त्यांच्याबद्दल कधी ऐकलं नव्हतं. यात लपवण्यासारखं किंवा खोटं बोलण्यासारखं काहीच नाही. मी त्यांना ओळखते असं बोलून लोकांची सहानुभूत घ्यायची किंवा मी त्यांना ओळखत नाही असं बोलून त्यांचा द्वेष पत्करायचा याचा मी विचारत केला नव्हता. खरं बोलायचं झालं तर बिग बॉसच्या घरात मी कोणालाच ओळखत नव्हते. माझ्यासाठी ते एक नवीन कुटुंब होतं. नंतर जेव्हा घरात हळूहळू इतर सेलिब्रिटी येऊ लागले आणि त्यांच्याबद्दल कौतुक करू लागले, बोलू लागले तेव्हा मला समजलं की त्या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत.”

बिग बॉसच्या घरात निक्कीने जेव्हा कधी वर्षाताईंशी भांडणं केलं, त्यानंतर तिने त्यांचा माफीसुद्धा मागितली. मात्र आधी भांडण करून नंतर माफी मागायची तुझी स्ट्रॅटेजीच आहे, असं वर्षा यांनी सुनावलं होतं. त्यावर बोलताना निक्की म्हणाली, “प्रत्येकाला स्पष्टीकरण देण्यासाठी माझा जन्म झाला नाही. मी किती खरी आहे, किती खोटी आहे हे मी स्पष्ट करत बसणार नाही. मी कोणालाही उत्तर द्यायला बांधिल नाही. तरी मी वर्षाताईंची मनापासून माफी मागितली होती. आता त्यांना ते कितपत खरं किंवा खोटं वाटतं हे त्यांच्यावर अवलंबून आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी मला सोशल मीडियावर फॉलो केलंय. मी सुद्धा त्यांना फॉलो केलं.”

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.