AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panchayat Season 4 Cast Fees: सचिव जी, मंजू देवी की प्रधान, ‘पंचायत 4’साठी कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन?

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'चा चौथा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनसाठी सर्वाधिक मानधन कोणत्या कलाकाराला मिळालं, ते जाणून घेऊयात.

Panchayat Season 4 Cast Fees: सचिव जी, मंजू देवी की प्रधान, 'पंचायत 4'साठी कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन?
panchayat season 4Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 26, 2025 | 9:32 AM
Share

टीव्हीएफच्या ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या चौथ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. नुकताच हा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये क्रांती देवी आणि मंजू देवी यांच्यात प्रधान बनण्यासाठी रंगलेली चुरस पहायला मिळतेय. ‘पंचायत’च्या या चौथ्या सिझनला आतापर्यंत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या सीरिजचे पहिले तीन सिझन तुफान गाजले. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये अभिनेता जितेंद्र कुमारने सचिवजीची भूमिका साकारली आहे, तर रघुबीर यादव हे प्रधानच्या भूमिकेत आहेत. मंजू देवीपासून प्रहलाद आणि विकास-रिंकीसुद्धा घराघरात लोकप्रिय झाले आहेत. ‘पंचायत’मुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा सर्वाधिक फायदा कोणी घेतला आणि या सिझनसाठी सर्वाधिक मानधन कोणाला मिळालं, ते जाणून घेऊयात..

‘पंचायत 4’साठी ज्या अभिनेत्याला सर्वाधिक मानधन मिळालं आहे, त्याचं डोकं अत्यंत जलद गतीने काम करतं. तो स्वत:च्या समस्या जरी सोडवू शकला नसला तरी मंजू देवी आणि प्रधानजी यांच्या प्रत्येक समस्येचं उत्तर त्याच्याकडे असतं. आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की हे पात्र नेमकं कोणतं आहे? ‘पंचायत’मधल्या सचिवजींना चौथ्या सिझनसाठी सर्वाधिक फी मिळाली आहे.

या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री नीना गुप्ता या जरी ज्येष्ठ कलाकार असल्या तरी ‘पंचायत’ला खरी प्रसिद्धी सचिवजींमुळे मिळाली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, जितेंद्र कुमार अर्थात अभिषेक त्रिपाठीला या चौथ्या सिझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी 70 हजार रुपये मानधन मिळालं आहे. म्हणजेच संपूर्ण सिझनसाठी त्याला 5 लाख 60 हजार रुपये मिळाले आहेत.

मानधनाच्या बाबतीत जितेंद्र कुमारनंतर दुसरा क्रमांक नीना गुप्ता यांचा लागतो. या संपूर्ण सिझनसाठी त्यांना चार लाख रुपये मानधन मिळालं आहे. प्रत्येक एपिसोडसाठी त्यांची फी 50 हजार रुपये होती. तिसऱ्या क्रमांकावर त्यांचे ऑनस्क्रीन पती आणि फुलेरा गावाचे प्रधान आहेत. अभिनेते रघुवीर यादव यांना प्रत्येक एपिसोडसाठी 40 हजार रुपये फी मिळाली आहे. म्हणजेच या चौथ्या सिझनमधून त्यांनी 3 लाख 20 हजार रुपये कमावले आहेत. प्रहलादची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला प्रत्येक एपिसोडसाठी 20 हजार रुपये मिळाले आहेत. म्हणजेच संपूर्ण सिझनसाठी त्याला 1 लाख 60 हजार रुपये मिळाले आहेत. तर चंदन रॉय म्हणजेच विकासलाही तेवढंच मानधन मिळालं आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.