AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaj Dheer Death: कर्ण नव्हे तर अर्जुन साकारणार होते पंकज धीर; क्षुल्लक कारणामुळे फाडला करार, बी. आर. चोप्रांनी थेट हाकललं

'महाभारत' या मालिकेत कर्णची भूमिका साकारलेले अभिनेते पंकज धीर यांची आधी अर्जुनाच्या भूमिकेसाठी निवड झाली होती. परंतु एक क्षुल्लक कारण देत त्यांनी ही भूमिका नाकारली होती. याविषयीचा किस्सा खुद्द त्यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता.

Pankaj Dheer Death: कर्ण नव्हे तर अर्जुन साकारणार होते पंकज धीर; क्षुल्लक कारणामुळे फाडला करार, बी. आर. चोप्रांनी थेट हाकललं
Pankaj DheerImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2025 | 2:37 PM
Share

बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत कर्णची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1988 मध्ये सुरू झालेल्या ‘महाभारत’ या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. परंतु या मालिकेतील कर्णासाठी नव्हे तर अर्जुनाच्या भूमिकेसाठी त्यांनी आधी निवड झाली होती. एका मुलाखतीत खुद्द पंकज यांनी याबद्दलचा किस्सा सांगितला होता. अर्जुनाच्या भूमिकेसाठी पंकज हे दिग्दर्शकांची पहिली पसंत होते. परंतु एका गोष्टीसाठी त्यांनी थेट नकार दिल्याने त्यांना थेट मालिकेतूनच काढून टाकण्यात आलं होतं.

‘लेहरे रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत पंकज यांनी सांगितलं होतं, “मी संवादलेखक राही मसूम रझा, भृंग तुपकारी आणि पंडित नरेंद्र शर्माजींसमोर माझं ऑडिशन दिलं होतं. त्या सर्वांना मी अर्जुनाच्या भूमिकेसाठी आवडलो होतो. आम्ही त्यावर होकार देत करारावर स्वाक्षरी केली. नंतर बी. आर. चोप्रा यांनी मला बोलावून सांगितलं की तुला बृहन्नलाचीही (अर्जुनाचंच एक रुप) भूमिका साकारावी लागणार आहे आणि त्यासाठी तुला मिशी काढावी लागेल. तेव्हा मी त्यांना थेट नकार देत म्हटलं होतं की, नाही.. मी हे करू शकत नाही. मी मिशी कापली तर अजिबात चांगला दिसणार नाही, असं त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी थेट सवाल केला की, तू अभिनेता आहेस की कोण? फक्त मिशीसाठी तू एवढ्या मोठ्या भूमिकेवर पाणी सोडतोय.”

फक्त मिशीसाठी अर्जुनाच्या भूमिकेला नकार देणं हा मूर्खपणा असल्याची कबुली नंतर पंकज यांनीसुद्धा दिली. परंतु नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. “त्यावेळी तो माझा मूर्खपणा होता. बी. आर. चोप्रा मला म्हणाले, इथून निघ आणि पुन्हा येऊ नकोस. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसबाहेर काढलं होतं. माझा करार फाडण्यात आला आणि त्यानंतर सहा महिने मी फक्त डबिंग करत फिरत होतो. नंतर चोप्रा यांनी स्वत:हून मला फोन केला आणि याचाल नशीब म्हणतात. मी कर्णची भूमिका साकारू शकेन का, असं त्यांनी मला विचारलंय. त्यावरही मी त्यांना पुन्हा विचारलं की, सर मला मिशी काढावी लागणार नाही ना? त्यांनी नकार देताच मी कर्णची भूमिका स्वीकारली. ती भूमिका माझ्या नशिबात होती”, असं पंकज यांनी सांगितलं.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत