AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaj Dheer Death: कर्ण नव्हे तर अर्जुन साकारणार होते पंकज धीर; क्षुल्लक कारणामुळे फाडला करार, बी. आर. चोप्रांनी थेट हाकललं

'महाभारत' या मालिकेत कर्णची भूमिका साकारलेले अभिनेते पंकज धीर यांची आधी अर्जुनाच्या भूमिकेसाठी निवड झाली होती. परंतु एक क्षुल्लक कारण देत त्यांनी ही भूमिका नाकारली होती. याविषयीचा किस्सा खुद्द त्यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता.

Pankaj Dheer Death: कर्ण नव्हे तर अर्जुन साकारणार होते पंकज धीर; क्षुल्लक कारणामुळे फाडला करार, बी. आर. चोप्रांनी थेट हाकललं
Pankaj DheerImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2025 | 2:37 PM
Share

बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत कर्णची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1988 मध्ये सुरू झालेल्या ‘महाभारत’ या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. परंतु या मालिकेतील कर्णासाठी नव्हे तर अर्जुनाच्या भूमिकेसाठी त्यांनी आधी निवड झाली होती. एका मुलाखतीत खुद्द पंकज यांनी याबद्दलचा किस्सा सांगितला होता. अर्जुनाच्या भूमिकेसाठी पंकज हे दिग्दर्शकांची पहिली पसंत होते. परंतु एका गोष्टीसाठी त्यांनी थेट नकार दिल्याने त्यांना थेट मालिकेतूनच काढून टाकण्यात आलं होतं.

‘लेहरे रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत पंकज यांनी सांगितलं होतं, “मी संवादलेखक राही मसूम रझा, भृंग तुपकारी आणि पंडित नरेंद्र शर्माजींसमोर माझं ऑडिशन दिलं होतं. त्या सर्वांना मी अर्जुनाच्या भूमिकेसाठी आवडलो होतो. आम्ही त्यावर होकार देत करारावर स्वाक्षरी केली. नंतर बी. आर. चोप्रा यांनी मला बोलावून सांगितलं की तुला बृहन्नलाचीही (अर्जुनाचंच एक रुप) भूमिका साकारावी लागणार आहे आणि त्यासाठी तुला मिशी काढावी लागेल. तेव्हा मी त्यांना थेट नकार देत म्हटलं होतं की, नाही.. मी हे करू शकत नाही. मी मिशी कापली तर अजिबात चांगला दिसणार नाही, असं त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी थेट सवाल केला की, तू अभिनेता आहेस की कोण? फक्त मिशीसाठी तू एवढ्या मोठ्या भूमिकेवर पाणी सोडतोय.”

फक्त मिशीसाठी अर्जुनाच्या भूमिकेला नकार देणं हा मूर्खपणा असल्याची कबुली नंतर पंकज यांनीसुद्धा दिली. परंतु नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. “त्यावेळी तो माझा मूर्खपणा होता. बी. आर. चोप्रा मला म्हणाले, इथून निघ आणि पुन्हा येऊ नकोस. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसबाहेर काढलं होतं. माझा करार फाडण्यात आला आणि त्यानंतर सहा महिने मी फक्त डबिंग करत फिरत होतो. नंतर चोप्रा यांनी स्वत:हून मला फोन केला आणि याचाल नशीब म्हणतात. मी कर्णची भूमिका साकारू शकेन का, असं त्यांनी मला विचारलंय. त्यावरही मी त्यांना पुन्हा विचारलं की, सर मला मिशी काढावी लागणार नाही ना? त्यांनी नकार देताच मी कर्णची भूमिका स्वीकारली. ती भूमिका माझ्या नशिबात होती”, असं पंकज यांनी सांगितलं.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे.

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर….

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर…

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल….

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल…