AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रतिष्ठित कुटुंबातील मुली असं करत नाही…, जेव्हा मनिषा कोईरालाने अनेक संकटांचा केला सामना

Manisha Koirala: प्रतिष्ठित कुटुंबातील मुली कधीच असं करत नाही..., अनेक वर्षांनंतर असं का म्हणाली मनिषा कोईराला? मनिषा कोईराला कायम तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य करत असते...

प्रतिष्ठित कुटुंबातील मुली असं करत नाही..., जेव्हा मनिषा कोईरालाने अनेक संकटांचा केला सामना
| Updated on: Nov 26, 2024 | 3:30 PM
Share

Manisha Koirala: अभिनेत्री मनिषा कोईराला हिने एकेकाळी एकापेक्षा एक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. अभिनेत्रीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिनेमा निर्माते विक्रमादित्य मोटवानी यांच्यासोबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला अनेकांनी ‘हीरामंडी’ वेब सीरिजमध्ये काम करण्यास नकार दिला होता. एवढंच नाही तर जेव्हा अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा विचार केला होता तेव्हाही लोकांनी तिच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

मनिषा कोईराला म्हणाली, ‘जेव्हा जवळपास 30 वर्षांपूर्वी मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की तेव्हा काळ फार वेगळा होता… माझ्या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. प्रतिष्ठित कुटुंबातील मुली सिनेमात काम करत नाही… मुलींनी अभिनेत्री होऊ नये… असं सतत सांगितलं जायचं…’

View this post on Instagram

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

‘मला पहिल्या सिनेमातून यश मिळाल्यानंतर सर्वांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला… माझ्यावर टीका करणाऱ्यांना माझ्यावर गर्व वाटू लागला…’ पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘एक वेब सीरिज करताना देखील मला अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागला…’

‘हीरामंडी प्रोजेक्टबद्दल मला कधीच शंका नव्हती. मी सुरुवातीपासून कथेत गुंतली होती. वेब सीरिज करण्याबाबत मला सुरुवातीपासूनच विश्वास होता, फक्त ती संजय लीला भन्साळी होती म्हणून नाही. परंतु या वस्तुस्थितीमुळे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एक संपूर्ण गेम चेंजर होणार होता…’ असं देखील अभिनेत्री मनिषा कोईराला म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मनिषा बॉलिवूडपासून दूर आहे. पण ‘हीरामंडी’ सीरिजमुळे मनिषा हिला पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये मनिषा हिने वेश्यालयाच्या मालकिणीची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीच्या भूमिकेचं नाव ‘मल्लिकाजान’ असं होतं.

मनिषा सध्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ सीरिजच्या दुसऱ्या भागासाठी काम करत आहे. सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना देखील सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.