AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर प्रेम संपत, पण…; लग्नाच्या 10 वर्षांनंतर असं का म्हणाली राणी मुखर्जी?

Rani Mukerji on happy marriage life | लग्नानंतर प्रेम कमी होत... काही वर्षांनी आकर्षण राहत नाही, पण एका कारणामुळे नातं टिकू शकतं..., राणी मुखर्जी हिने सांगितले लग्नाचे अनुभव... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राणी मुखर्जी हिच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा... आदित्य आणि राणी यांच्या लग्नाला 10 वर्ष झालीत पूर्ण...

लग्नानंतर प्रेम संपत, पण...; लग्नाच्या 10 वर्षांनंतर असं का म्हणाली राणी मुखर्जी?
| Updated on: Mar 23, 2024 | 8:52 AM
Share

झगमगत्या विश्वात कोणाचं नातं कधी घटस्फोटापर्यंत पोहोचेल सांगता येत नाही. पण अभिनेत्री राणी मुखर्जी हिने सिनेमा दिग्दर्शक, निर्माता आदित्या चोप्रा यांच्यासोबत लग्न केलं आणि लग्नाच्या अनेक वर्षांनंतर देखील दोघे सुखी संसार करत आहेत. राणी तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलताना दिसते. पण आता अभिनेत्रीने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एका योग्य कारणामुळे लग्न केलं पाहिजे. कारण अनेक महिलांना लग्नानंतर वाईट नात्यात अडकताना मी पाहिलं आहे… असं राणी म्हणाली…

लग्न आणि वैवाहिक आयुष्याबद्दल राणी म्हणाली, ‘मला असं वाटतं आदित्य एक उत्तम पुरुष आहे. मी अशा घरात मोठी झाली आहे, जेथे लोकांचा आदर, सन्मान कसा करायचा हे मला शिकवलं आहे. माझ्या आयुष्यात याच गोष्टीचं फार महत्त्व आहे. आदित्य पाहिलं तेव्हा इतरांप्रती त्याची वागणूक मला आवडली. टीममध्ये त्याची लिडरशीप पाहून मी आकर्षित झाली…’

पुढे राणी म्हणाली, ‘आदित्य प्रचंड फेअर आहे… फक्त त्वचेने नाही तर, मनाने देखील… सुरुवातील तुम्ही प्रेम असल्यामुळे एकमेकांकडे आकर्षित होता. पण लग्नानंतर प्रेम कमी होतं. पण मनात असलेला आदर आणि सन्मान कधीही कमी होत नाही. मी जग फार जवळून पाहिलं आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. माझ्या आयुष्यात इंडस्ट्रीमधील पुरुषाची एन्ट्री होणार होती तर, आदित्य याच्याशिवाय दुसऱ्या कोणाची झाली नसती… असं देखील अभिनेत्री म्हणाली.

‘कभी अलविदा न केहना’ सिनेमाचं उदाहरण देत राणीने सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ‘अशा अनेक महिला आहेत, ज्या लग्न केलंय म्हणून आयुष्य जगत आहेत. नात्यात कधीच स्वतःचे विचार मांडू शकत नाहीत. काही वर्षांनंतर त्या वृद्ध होतात आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तरुण मुलगी असताना मी त्या सिनेमात भूमिका बजावली होती. म्हणून त्या सिनेमामुळे मला जोडीदार निवडण्यात मदत झाली. तेव्हा मला कळलं लग्न एका योग्य कारणासाठी झालं पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या कारणामुळे लग्न करत असाल तर संपूर्ण आयुष्य खराब होईल…’

लग्न आणि वैवाहिक आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आदर आहे. कारण लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांमध्ये असलेलं आकर्षण कमी होतं. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर, तुमच्यामध्ये त्याग करण्याची तयारी असते. सांगायचं झालं तर, राणी आणि आदित्य यांनी 2014 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी देखील आहे. तिचं नाव अदिरा असं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.